परभणीत शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: April 28, 2017 03:22 IST2017-04-28T03:22:00+5:302017-04-28T03:22:12+5:30
तालुक्यातील बांदरवाडा येथील तुकाराम मुक्तीराम वाघमारे (वय ३८) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून राहत्या

परभणीत शेतकऱ्याची आत्महत्या
पाथरी (जि. परभणी) : तालुक्यातील बांदरवाडा येथील तुकाराम मुक्तीराम वाघमारे (वय ३८) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून राहत्या घरी छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली.
पाथरी तालुक्यातील बांदरवाडा येथील तुकाराम मुक्तीराम वाघमारे (वय ३८) यांना दोन एकर शेत जमीन होती. पत्नी, दोन मुलांसह ते शेतीवरच उपजीविका करीत होते. शेतीसाठी तुकाराम वाघमारे यांनी पाथरी येथील भारतीय स्टेट बँक शाखेचे व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मिळून १ लाख रुपये कर्ज काढले होते. मात्र शेती पिकत नसल्याने ते चिंताग्रस्त होते. २७ एप्रिल रोजी दुपारी २च्या सुमारास तुकाराम वाघमारे यांनी घराच्या छताच्या कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. कामानिमित्त बाहेर गेलेली त्यांची पत्नी परत घरी आली असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. महादेव मुक्तीराम वाघमारे यांनी दिलेल्या खबरीवरून पाथरी पोलिसांनी नोंद केली आहे. (वार्ताहर)
लातूरमध्येही आत्महत्या
निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील सावरी येथील संजय जाधव (३८) या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून गुरुवारी सकाळी आत्महत्या केली. जाधव यांनी जिल्हा बँकेसह अन्य बँकांचे जवळपास ७ लाखांचे कर्ज काढले होते.