शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

परमबीर सिंह अखेर मुंबईत  गुन्हे शाखेसमोर प्रकटले ! गोरेगाव खंडणी प्रकरणात सहभागाचा आरोप अमान्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 06:44 IST

गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मुंबई : गेले सात महिने अज्ञातवासात गेलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे अखेर गुरुवारी मुंबईत प्रगटले. गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात फरार घोषित करण्यात आलेल्या सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजेरी लावली. एकेकाळी परमबीर हे ज्यांचे प्रमुख होते त्याच पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन आपली साक्ष नोंदवण्याची नामुष्की आली.गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि दाऊदचा कथित साथीदार रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात गुन्हे शाखेने विशेष एनआयए न्यायालयाकडून परवानगी घेत तळोजा कारागृहातून वाझे याचा ताबा घेत अटक केली होती.  गोरेगाव येथील दाखल खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले. त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर फरारची नोटीसही चिकटवली होती. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून, देशातच असल्याचा दावा करत ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती दिली होती. त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचे  सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश दिल्याने पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजेच ६ डिसेंबरपर्यंत त्यांना अटकेचे संरक्षण मिळाले आहे. परमबीर यांनी आरोप फेटाळले गुन्हे शाखेने अग्रवालने सादर केलेल्या पुराव्यावरून परमबीर यांना प्रश्न विचारले. यादरम्यान सचिन वाझेसोबत झालेल्या संभाषणाबरोबर विविध ऑडिओ, व्हिडिओ क्लिप त्यांना दाखवण्यात आल्या. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, आपण वाझेलाही कुणाकडून पैसे घेण्यास सांगितले नाही. वाझेला अन्य कोणी सांगितले असल्यास त्यांच्याकडे चौकशी करावी, असेही परमबीर यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले. चांदीवाल आयोगाने दिली तंबीपरमबीर सिंग यांच्याविरुद्धचा वॉरंट आम्ही अजूनही रद्द केलेले नाही, याची जाणीव ठेवा आणि त्यांना आयोगासमोर हजर राहायला सांगा, या शब्दांत न्या. कैलास चांदीवाल यांनी परमबीर सिंह यांच्या वकिलाची कानउघाडणी केली. तसेच आयोगासमोर परमबीर सिंग हजर झाले नाहीत, तर आम्हाला पोलीस यंत्रणेचा आधार घ्यावा लागेल, असेही बजावले.

परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाइल लपवला- परमबीर सिंह यांनी २६/११ मधील दहशतवादी अजमल कसाबचा मोबाइल लपवल्याचा खळबळजनक आरोप निवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) समशेर पठाण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तसेच परमबीर यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचेही आरोपात नमूद केले आहे. - २००८ मध्ये झालेल्या २६/११ नंतर यातील दहशतवादी अजमल कसाबला डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरगाव चौपाटी परिसरात अटक करण्यात आली. याबाबत माळी यांच्याशी बोलताना कसाबला पकडले तेव्हा त्याच्याकडून मोबाइल जप्त करत तो कांबळे हवालदाराकडे देण्यात आला. यादरम्यान तत्कालीन एटीएसप्रमुख परमबीर सिंह यांना त्या मोबाइलबाबत समजताच त्यांनी कांबळेंकडून तो ताब्यात घेतला. हा मोबाइल या प्रकरणातला महत्त्वाचा दुवा आहे.  

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस