शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

'महाविकास आघाडी'मुळे पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्गही खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 14:17 IST

परळी मतदार संघातील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठविण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वाढलेल्या प्राबल्यामुळे पंकजा यांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर होणार हेही तेवढंच खरं आहे. 

मुंबई - माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पराभावाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांच्या विधान परिषदेची चर्चा सुरू झाली होती. मात्र राज्यातील नवीन समिकरणं उदयाला आल्यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या निर्मितीमुळे भाजपला विधान परिषद निवडणूकही जड जाणार आहे. यामुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आल्यामुळे सहाजिकच या पक्षांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचा परिणाम विधान परिषदेच्या जागांवरही होणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त आणि विधानसभेवर निवडून येणाऱ्या सदस्यांची मते कमी होणार आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

2020 मध्ये राज्यपाल नियुक्त 12, आमदारांद्वारे निवडल्या जाणारी 9 आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडलेल्या 5 सदस्यांचा असा एकून 26 सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. शिवसेना-भाजप युती असती तर 26 पैकी किमान 13 जागा भाजपला मिळाल्या असत्या. आता मात्र या जागा मिळवण्यासाठी भाजपला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 

परळी मतदार संघातील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठविण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वाढलेल्या प्राबल्यामुळे पंकजा यांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर होणार हेही तेवढंच खरं आहे.