शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

"आता जे कुणबीत आले, त्यांनी एक मराठा, लाख मराठाऐवजी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 23:06 IST

ओबीसीत जेवढी संख्या आहेत त्यामुळे नक्की ओबीसीत दाटीवाटी होणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

बीड - सरकारने मराठा आरक्षणाबाबतीत काढलेल्या अध्यादेशाला १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी दिलीय. त्यामुळे या काळात काय आक्षेप येतात, ते कायद्यात बसेल हे पाहावे लागेल. मराठा समाजाला कायद्यात बसणारे आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी वेळोवेळी भूमिका राहिली आहे. जेव्हा या अध्यादेशावर शिक्कामोर्तब होईल तेव्हा खऱ्याअर्थाने अभिनंदन करण्याची गरज आहे. आता कुणबी प्रमाणपत्रे घेऊन मराठा समाजातील एक पिढी ओबीसीत आलेली आहे. आता त्यांनी एक मराठा, लाख मराठा म्हणायची गरज नाही. आता त्यांनी एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही असं मला वाटते. यामुळे त्यांचा विजय नकारात्मक वाटणार नाही. लोकांच्या मनावर कुठलाही ओरघडा ओढला जाणार नाही असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट आणू पाहताय त्या प्रवृत्तींना आपल्याला आळा घातला पाहिजे. यात संयमाची भूमिका घेण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न केला. सरकारने अध्यादेश काढलाय. सर्वसंमतीने अध्यादेश निघालेला असावा. या अध्यादेशात मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी मांडल्या होत्या. त्यातील एका मागणीवर महत्त्वाचा प्रकाश टाकला जाईल. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावे. यात सगेसोयरे यांची व्याख्या केली आहे. आजही लाखो कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहे. त्यामुळे या प्रश्नाला कुठेतरी सकारात्मक मार्ग मिळाला आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा हे साध्य करायला मनोज जरांगे यशस्वी झालेत हे म्हणायला हरकत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या अशी मागणी आम्ही केलेली आहे. पण अनेक वर्ष ज्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे घेतलेली आहेत. पूर्वीच्या काळात पर्यायाने कुणबी प्रमाणपत्रे काहींनी घेतली. विदर्भात घेतली, पश्चिम महाराष्ट्रात काहींनी घेतली. मराठवाड्यात घेतले नाहीत. आता ही पिढी कुणबीत येतेय. आता कुणबीत आल्याने ओबीसीत आलेत. ओबीसीत जेवढी संख्या आहेत त्यामुळे नक्की ओबीसीत दाटीवाटी होणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय. परंतु हा धक्का सकारात्मककडे कसे न्यायचे हे सरकार बघेल. दोन समाजातील वितुष्ट संपवावे. हा निर्णय टिकल्यानंतर किमान जातीवाचक तेढ होऊ नये ही अपेक्षा आहे असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले. 

दरम्यान, ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर नक्की परिणाम होणार आहे. ज्यांनी अनेक वर्ष प्रमाणपत्रे घेतली नाही ते ओबीसीत येणार आहे. ते राजकीय आरक्षणाचेही भाग होणार आहे. ही अपरिहर्यता आहे ती स्वीकारली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देऊन ते ओबीसी झाल्याने ओबीसी प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणात नक्कीच बदल होणार आहे. आता या गोष्टीला सकारात्मक विराम लागला पाहिजे. कुणबी प्रमाणपत्रे घेऊन असा काही विजय झालाय असं करून समाजासमाजात असंतोष वाटेल असं वातावरण न होऊ देणे ही मराठा आंदोलक आणि सरकारची जबाबदारी आहे असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट सांगितले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील