शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'नौटंकी' म्हणणाऱ्या जलील यांना पंकजा मुंडेंच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 13:42 IST

आता उपोषण करून 'नौटंकी' करण्याचे काम भाजप नेते करत असल्याचा आरोप जलील यांनी केला होता.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु झाले आहे. मात्र, हे उपोषण म्हणजे भाजपची 'नौटंकी' असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. जलील यांनी केलेल्या आरोपाला आता पंकजा मुंडेंनी उत्तर दिले आहे.

काही राजकीय नेत्यांना जनता मूर्ख असल्याचे वाटत आहे. त्याचाच भाग म्हणजे भाजप नेत्यांकडून आज औरंगाबादमध्ये होत असलेले उपोषण. सत्ता असताना मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवला नाही, मात्र आता उपोषण करून 'नौटंकी' करण्याचे काम भाजप नेते करत असल्याचा आरोप जलील यांनी केला होता.

जलील यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, आम्ही सत्तेत असताना सुद्धा खूप कामे केली आहेत. तर आजचे उपोषण हे मराठवाड्याचा जनतेच्या पाणी प्रश्नासाठी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी याचे स्वागत केले पाहिजे. स्वागत करत नसाल तर किमान टीका तरी करू नयेत असा टोला पंकजा मुंडे यांनी जलील यांना लगावला.

तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मराठवाड्याचा प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. आमच्या सरकारने कामे केलीच, मात्र या सरकारने सुद्धा तेवढ्याच जलदगतीने कामे करून मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे या मागणीसाठी हे लाक्षणिक उपोषण असल्याचे सुद्धा पंकजा मुंडे म्हणाल्यात.