शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पंकजा-धनंजय मुंडे यांनी एकत्रित राहावे; मुंडे बहीण-भाऊ प्रथमच एका व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:47 IST

जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे

परळी (जि. बीड) : परळीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पंकजा मुंडेधनंजय मुंडे हे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्रित होते. पंकजा व धनंजय तुम्ही असेच एकत्र राहा. आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी आहे. हा मंच असाच एकत्रित राहू द्या, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे या पालकमंत्री असतानाच्या कामांचा उल्लेख केला. तसेच आता धनंजय मुंडे यांना निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वासही दिला.

केंद्र शासनाच्या  प्रसाद योजनेत परळी वैद्यनाथचा समावेश करण्यासाठी आपण स्वतः केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू. परळी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग परिपूर्ण विकासाने समृद्ध होईल. सध्या मराठवाडा दुष्काळाच्या छायेमुळे संकटात आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. मात्र, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. शासन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. 

बाजूच्या घरातही तुम्हाला बोलवत नाहीत...ज्यांना कोणी बाजूच्या घरातही बोलवत नाहीत, असे लोक आमच्यावर टीका करू लागले आहेत. आम्हाला प्रचारासाठी परराज्यातही बोलवतात, यामुळे विरोधकांचे पोट दुखू लागल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. आता पुढच्या वेळी अजित पवार यांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पुढच्या अडीच वर्षांत सोलार पंप देणारजलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारा तास वीज कशी मिळेल यासाठी पुढच्या अडीच वर्षांत सोलार पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले. लेक माझी भाग्याची, लेक लाडकी या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्या कुटुंबात मुलीने जन्म घेतला ते कुटुंब लखपती करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. भाषणाच्या प्रारंभी फडणवीस यांनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ऊर्जेमुळेच आपण राजकारणात असल्याचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केले.

मराठवाड्याला  हक्काचे पाणीनिसर्गावर अवलंबून न राहता कायमस्वरूपी मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचनाच्या विविध योजना आखण्यात आल्या आहेत.  मराठवाड्याला त्यांचे हक्काचे पाणी देण्याचा निर्धार सरकारने केला आहे. इतरत्र वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देऊ. मराठवाडा दुष्काळमुक्त केला जाईल. बीडच्या पाण्याचाही प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे