शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

Pandharpur Wari: आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 10:54 IST

Pandharpur Wari: कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच वारीची ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे :  महाराष्ट्राची शेकडो वर्षांची जुनी आध्यात्मिक परंपरा असलेला आषाढी एकादशीनिमित्त निघणारा पालखी सोहळा यंदा निघावा की नाही, या संदर्भातला निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत घेतला जाणार आहे.दरवर्षी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांची, तर देहूगावातून तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते. राज्यभरातले हजारो वारकरी या दोन्ही पालखी सोहळ्यांमधल्या शेकडो दिंड्यांमध्ये सहभागी होत असतात. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आषाढी वारीच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी पुण्यात बैठक झाली. देहू आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे प्रमुख व ज्येष्ठ वारकऱ्यांनी यावेळी काही अटी-शर्तींसह पायी पालखी सोहळ्यास परवानगी द्यावी, यासाठी प्रचंड अग्रह धरला. मात्र राज्यात पहिल्या लाटेपेक्षा सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. गर्दी झाल्यानंतर कोरोना आटोक्याबाहेर जातो, याची राज्यात आणि देशात अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. तरीदेखील वारीसंदर्भात सर्वांच्या भावना लक्षात घेऊन येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.पालखी सोहळ्याच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य अधिकारी ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित होते.बैठकीनंतर पत्रकारांना पवार यांनी सांगितले की, सर्व विश्वस्त व वारकरी संप्रदाय पायी वारीसाठी आग्रही आहे. मात्र, आजही महाराष्ट्रात १८ जिल्हे असे आहेत की जिथे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे.  

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAlandiआळंदीdehuदेहूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस