शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पलूस-कडेगाव विधानसभा : देशमुख बंधूंना अर्ज भरण्याचे भाजपाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 04:39 IST

सांगली : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीने बुधवारी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोघांनाही पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल होणार असले तरी, निवडणूक लढवायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.कॉँग्रेस ...

सांगली : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीने बुधवारी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोघांनाही पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल होणार असले तरी, निवडणूक लढवायची की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे.कॉँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यापासून कॉँग्रेस व भाजपमधील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. कॉँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न चालू ठेवले आहेत. राष्टÑवादीचा सकारात्मक पाठिंबा मिळाला असला तरी, भाजपने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, बुधवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने देशमुख बंधूंना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १४ मेपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर १३ मे पर्यंत भाजपला निवडणूक लढविण्याबाबतचा अंतिम निर्णय घेता येणार आहे.दबावतंत्राचा भाग म्हणून सध्या भाजपने अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्णय कायम राहणार की बदलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविला आहे. जिल्ह्यातील बैठकीतही हाच निर्णय झाला. आता राज्यस्तरावरील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.काय होऊ शकतेमाजी आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर लागलेल्या याच मतदारसंघातील विधानसभेची पोटनिवडणूक डॉ. पतंगराव कदम यांनी लढविली होती. त्यामुळे आता त्यांच्या पश्चात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपने निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे निवडणूक लढविण्याचा निर्णय होऊ शकतो, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.भाजपाचे टार्गेटमुख्य निवडणूकभाजपामधील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या विधानसभेचा वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळे वर्षभरात दोनवेळा मतदारसंघात ताकद पणाला लावण्यापेक्षा पुढील वर्षी होणाºया मुख्य निवडणुकीतच ताकद लावण्याची वरिष्ठ नेत्यांची मानसिकता आहे. त्याबाबत त्यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाºयांशीही चर्चा केली आहे. स्थानिक पदाधिकाºयांनीही प्रदेशच्या निर्णयाला बांधिल असल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीBJPभाजपा