शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Palghar bypoll results 2018: 'काँग्रेस ही लेना बँक, देना बँक नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:34 IST

काँग्रेस आणि बविआने निवडणूकपूर्व आघाडी केली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता.

मुंबई: काँग्रेसची एकंदर राजकीय वागणूक ही 'लेना' बँकेसारखी आहे, 'देना' बँकेसारखी नाही, असे विधान बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी केले. पालघर पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या स्वार्थी वृत्तीमुळे विरोधक एकटवत नसल्याचा आरोप केला.

पालघर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांच्या दमदार कामगिरीनंतरही भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) बळीराम जाधव यांनी जवळपास सव्वादोन लाख तर माकप आणि काँग्रेसने अनुक्रमे 71 हजार आणि 47 हजार मते मिळवली. त्यामुळे काँग्रेस आणि बविआने निवडणूकपूर्व आघाडी केली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, असे मत राजकीय तज्ज्ञांनी मांडले. यावरून बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी तुम्ही काँग्रेससोबत युतीसाठी चाचपणी केली होती का, असा प्रश्न चर्चेदरम्यान विचारण्यात आला. त्यावेळी ठाकूर यांनी काँग्रेसच्या राजकीय स्वभावामुळे ही युती प्रत्यक्षात आली नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसचे वर्तन हे लेना बँकेसारखे आहे, देना बँकेसारखे नाही, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस