शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतीनसह प्रबळगडाकडे दुर्लक्ष, वर्षाला ५० हजार पर्यटकांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:17 IST

ट्रेकिंगसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख ठिकाणांमध्ये कलावंतीन दुर्गचा समावेश होतो.

- वैभव गायकरपनवेल : ट्रेकिंगसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख ठिकाणांमध्ये कलावंतीन दुर्गचा समावेश होतो. खडक फोडून तयार केलेल्या पाय-या व शेवटच्या टप्पा दोरखंडाच्या सहाय्याने चढून जाण्याचे आव्हान पेलण्यासाठी देश - विदेशातील पर्यटक याठिकाणी हजेरी लावत असतात. वर्षाला ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक येथे येत असून या ठिकाणाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रबळमाची गावापर्यंत जाण्यासाठी रोडही बनविण्यात आला नसल्यामुळे पर्यटक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.प्रबळगडावरून दिसणारा कलावंतीन दुर्गचा सुळका पर्यटकांचे व हौशी छायाचित्रकारांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. सोशल मीडियावरून गड व त्यावर जाण्यासाठीच्या खडतर पायºया देशातील व विदेशातील पर्यटकांना याठिकाणी येण्यास भाग पाडत आहेत. ट्रेकिंगची आवड जोपासणारे एकदा तरी कलावंतीन दुर्गवर जायचे स्वप्न पहात असतात. पनवेलपासून जवळ असलेले दोन्ही किल्ले पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. रायगडनंतर सर्वाधिक भेट देणाºया किल्ला म्हणूनही याची ओळख आहे. परंतु पुरातत्व विभाग व शासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी एकही योजना अद्याप राबविण्यात आलेली नाही.ठाकूरवाडीपासून पाच किलोमीटरपेक्षा जास्त डोंगर पायी चढून प्रबळमाजी गावामध्ये जावे लागत आहे. येथील दोन्ही आदिवासी वाड्यांपर्यंत जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता करण्यात आलेला नाही. यापूर्वी केलेल्या रोडची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रोड वाहून गेला असून फक्त पायवाट शिल्लक आहे. यामुळे पर्यटकांना ठाकूरवाडीमध्ये गाडी लावून प्रबळमाचीपर्यंत जावे लागत असून तेथून पुन्हा कलावंतीन दुर्ग व प्रबळगडाची अवघड वाट पूर्ण करावी लागत आहे.प्रबळ गडावर जाण्यासाठी कलावंतीनच्या पायथ्यापासून पायवाट आहे. पायवाटेची स्थिती बिकट असून ती व्यवस्थित करण्याची गरज आहे. वाट व्यवस्थित नसल्यामुळे अनेक पर्यटकांना गावात येवून पुन्हा दुसºया वाटेने गडावर जावे लागत आहे. प्रबळगडावर जाण्याची वाटही ओढ्यातून आहे. गडावर पुरातन वास्तूचे अवशेष आहेत. पाण्याच्या टाक्या, काळाबुरूज पाहण्यासारखे आहे. परंतु घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणांकडे जाण्यासाठीची वाट अवघड झाली आहे. पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्यामुळे येथे येणाºया पर्यटकांना गड पाहताना अडचणी निर्माण होत आहेत.प्रबळगडाचा इतिहास१४९० - बहामनी साम्राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत आला.१६३६ - शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ वशिवाजी महाराजांचे वास्तव्य किल्ल्यावर होते.१६३६ - शहाजी राजांनी तहामध्ये हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीला दिला१६५७ - छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर कोकण, कल्याण भिवंडी प्रांत व तेथील किल्ले काबीज केले. या मोहिमेमध्ये महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीतील प्रबळगड, प्रधानगड, चौल, तळागड, घोसाळगड हे किल्ले जिंकले. स्वराज्याचे सरदार आबाजी महादेव यांनी हा प्रांत स्वराज्यात आणला.१६६५ - पुरंदरच्या तहामध्ये २३ किल्ले मोघलांना देण्यात आले त्यामध्ये प्रबळगडाचा समावेश होता. तह मोडल्यानंतर पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आला.१६८९ - मोघलांनी छापा टाकून मध्यरात्री हा किल्ला ताब्यात घेतला, परंतु नंतर लगेचच तो पुन्हा मराठ्यांनी जिंकला.१८१८ - प्रबळगड इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी किल्ल्यावरील वास्तू पाडून टाकल्या.१८२८ - ब्रिटिशांविरोधात उठाव करणाºया देशप्रेमी ३०० लढवय्याने या किल्ल्यावर आश्रय घेतला होता.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रtourismपर्यटन