शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

कलावंतीनसह प्रबळगडाकडे दुर्लक्ष, वर्षाला ५० हजार पर्यटकांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:17 IST

ट्रेकिंगसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख ठिकाणांमध्ये कलावंतीन दुर्गचा समावेश होतो.

- वैभव गायकरपनवेल : ट्रेकिंगसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख ठिकाणांमध्ये कलावंतीन दुर्गचा समावेश होतो. खडक फोडून तयार केलेल्या पाय-या व शेवटच्या टप्पा दोरखंडाच्या सहाय्याने चढून जाण्याचे आव्हान पेलण्यासाठी देश - विदेशातील पर्यटक याठिकाणी हजेरी लावत असतात. वर्षाला ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक येथे येत असून या ठिकाणाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रबळमाची गावापर्यंत जाण्यासाठी रोडही बनविण्यात आला नसल्यामुळे पर्यटक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.प्रबळगडावरून दिसणारा कलावंतीन दुर्गचा सुळका पर्यटकांचे व हौशी छायाचित्रकारांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. सोशल मीडियावरून गड व त्यावर जाण्यासाठीच्या खडतर पायºया देशातील व विदेशातील पर्यटकांना याठिकाणी येण्यास भाग पाडत आहेत. ट्रेकिंगची आवड जोपासणारे एकदा तरी कलावंतीन दुर्गवर जायचे स्वप्न पहात असतात. पनवेलपासून जवळ असलेले दोन्ही किल्ले पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. रायगडनंतर सर्वाधिक भेट देणाºया किल्ला म्हणूनही याची ओळख आहे. परंतु पुरातत्व विभाग व शासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी एकही योजना अद्याप राबविण्यात आलेली नाही.ठाकूरवाडीपासून पाच किलोमीटरपेक्षा जास्त डोंगर पायी चढून प्रबळमाजी गावामध्ये जावे लागत आहे. येथील दोन्ही आदिवासी वाड्यांपर्यंत जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता करण्यात आलेला नाही. यापूर्वी केलेल्या रोडची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रोड वाहून गेला असून फक्त पायवाट शिल्लक आहे. यामुळे पर्यटकांना ठाकूरवाडीमध्ये गाडी लावून प्रबळमाचीपर्यंत जावे लागत असून तेथून पुन्हा कलावंतीन दुर्ग व प्रबळगडाची अवघड वाट पूर्ण करावी लागत आहे.प्रबळ गडावर जाण्यासाठी कलावंतीनच्या पायथ्यापासून पायवाट आहे. पायवाटेची स्थिती बिकट असून ती व्यवस्थित करण्याची गरज आहे. वाट व्यवस्थित नसल्यामुळे अनेक पर्यटकांना गावात येवून पुन्हा दुसºया वाटेने गडावर जावे लागत आहे. प्रबळगडावर जाण्याची वाटही ओढ्यातून आहे. गडावर पुरातन वास्तूचे अवशेष आहेत. पाण्याच्या टाक्या, काळाबुरूज पाहण्यासारखे आहे. परंतु घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणांकडे जाण्यासाठीची वाट अवघड झाली आहे. पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्यामुळे येथे येणाºया पर्यटकांना गड पाहताना अडचणी निर्माण होत आहेत.प्रबळगडाचा इतिहास१४९० - बहामनी साम्राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीत आला.१६३६ - शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ वशिवाजी महाराजांचे वास्तव्य किल्ल्यावर होते.१६३६ - शहाजी राजांनी तहामध्ये हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीला दिला१६५७ - छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर कोकण, कल्याण भिवंडी प्रांत व तेथील किल्ले काबीज केले. या मोहिमेमध्ये महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीतील प्रबळगड, प्रधानगड, चौल, तळागड, घोसाळगड हे किल्ले जिंकले. स्वराज्याचे सरदार आबाजी महादेव यांनी हा प्रांत स्वराज्यात आणला.१६६५ - पुरंदरच्या तहामध्ये २३ किल्ले मोघलांना देण्यात आले त्यामध्ये प्रबळगडाचा समावेश होता. तह मोडल्यानंतर पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आला.१६८९ - मोघलांनी छापा टाकून मध्यरात्री हा किल्ला ताब्यात घेतला, परंतु नंतर लगेचच तो पुन्हा मराठ्यांनी जिंकला.१८१८ - प्रबळगड इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी किल्ल्यावरील वास्तू पाडून टाकल्या.१८२८ - ब्रिटिशांविरोधात उठाव करणाºया देशप्रेमी ३०० लढवय्याने या किल्ल्यावर आश्रय घेतला होता.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रtourismपर्यटन