शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पादुका सार्इंच्या, विश्वभ्रमंती विश्वस्त,अधिका-यांची; दौरा थांबविण्यासाठी साईभक्त उपोषण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 20:01 IST

प्रमोद आहेरशिर्डी : देशभर प्रसिद्ध असूनही शिर्डीतील आगमनानंतर साईबाबांनी आपल्या हयातीत कधी पंचक्रोशीच्या सीमा ओलांडल्या नाहीत. त्यांच्या समाधी शताब्दीच्या नावाखाली त्यांच्या पादुकांच्या रूपाने संस्थान त्यांना विश्वभ्रमंतीला घेऊन निघाले आहे.जगभरातील करोडो भाविकांच्या हृदयात कोणत्याही प्रयत्नांशिवाय जगभरात पोहचलेल्या साईबाबांचा प्रचार ही अफलातून कल्पना आहे. ‘माझा माणूस जगात कोठेही असला तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ...

प्रमोद आहेरशिर्डी : देशभर प्रसिद्ध असूनही शिर्डीतील आगमनानंतर साईबाबांनी आपल्या हयातीत कधी पंचक्रोशीच्या सीमा ओलांडल्या नाहीत. त्यांच्या समाधी शताब्दीच्या नावाखाली त्यांच्या पादुकांच्या रूपाने संस्थान त्यांना विश्वभ्रमंतीला घेऊन निघाले आहे.जगभरातील करोडो भाविकांच्या हृदयात कोणत्याही प्रयत्नांशिवाय जगभरात पोहचलेल्या साईबाबांचा प्रचार ही अफलातून कल्पना आहे. ‘माझा माणूस जगात कोठेही असला तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढतात तसे मी त्याला शिर्डीला ओढून आणीन’ असे साईबाबा नेहमी म्हणत. त्यांच्या या वचनालाच संस्थानच्या कृतीतूनच हरताळ फासला गेला आहे. विजयादशमीनंतर गोव्यापासून या दौ-याची सुरूवात झाली. राज्याचे सर्व जिल्हे, प्रत्येक राज्याच्या राजधान्या, महत्त्वाची शहरे तसेच पंचवीस देशात या पादुका नेण्यात येणार आहेत. यानिमित्त संस्थानचे पदाधिकारी व अधिका-यांवर देश-विदेशात भ्रमंती करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.जेथे साई अगोदरच पोहचले तेथेच या पादुका जाणार आहेत. ‘माझ्या समाधी नंतर शिर्डीत मुंग्यासारखी गर्दी होईल’ असे बाबा म्हणत. याची नित्य प्रचितीही येते आहे. समाधी शताब्दी वर्षात या गर्दीचा उच्चांक होईल, असे वाटत असतांनाच साईपादुकांची वर्षभर विश्वभ्रमंती सुरू झाली आहे. जगभरातील लोक ज्याच्या दारी दर्शनासाठी तिष्ठत आहेत, त्यालाच आता घरोघरी फिरविले जाणार आहे़ यामुळे ‘भाविक साईदरबारी नव्हे तर साईच आपल्या दारी’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शताब्दीत शिर्डीतील गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता मावळली आहे. याशिवाय दौ-यात काही ठिकाणी आयोजक व्यावसायिकदृष्ट्या बघत असल्याची चर्चा आहे. सुरूवातीला दौ-याचे समर्थन करणा-या शिर्डीकरांमध्येही अस्वस्थता पसरत आहे.बाबांच्या हयातीतील त्यांचे परमभक्त तात्या कोते व बायजाबाई कोते यांचे वंशज सर्जेराव कोते यांनी पादुकांच्या अमेरिका दौ-यावर आक्षेप घेत द्वारकामाई समोर उपोषणाचा इशारा दिला आहे. तर तुकाराम गोंदकर यांनी ग्रामस्थांना पादुका भ्रमंतीबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. शताब्दीत अशा निष्फळ प्रचाराची नाही तर शिर्डीत आलेल्या भाविकांचे दर्शन व वास्तव्य आनंददायी कसे होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने ते सोडून ‘चमको व घुमकोगिरी’ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Ahmadnagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा