शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी, १६६ कारखान्यांकडे थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 02:08 IST

राज्यातील केवळ २७ साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम दिलेली आहे.

पुणे : राज्यातील केवळ २७ साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम दिलेली आहे. अजूनही १६६ साखर कारखान्यांकडे ४ हजार ९२६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असून, १४ हजार ८८१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, साखर आयुक्तालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोरआली आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला उठाव नसल्याने बहुतांश कारखान्यांकडे एफआरपी थकीत होती. साखरेचा उत्पादन खर्च आणि साखरेची किमान आधारभूत किंमत यामध्ये चारशे ते साडेचारशेंचा फरक असल्याचे साखर कारखान्यांचे म्हणणे होते. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरुन ३५०० रुपये करावा अशी मागणी कारखान्यांनी केली होती. थकीत एफआरपीचा आकडा वाढल्याने, शेतकरी संघटनांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात साखर आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. अखेरीस केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपयांवरुन ३१०० रुपये केला.यंदाच्या गाळप हंगामानुसार राज्यात १५ फेब्रुवारीच्या गाळपानुसार १२ हजार ९४९ कोटी रुपयांची एफआरपी दिली होती. तर, ४ हजार ८६४ कोटी रुपये थकीत होते. तर, १५ मार्चच्या अहवालानुसार राज्यात ८३९.६९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यानुसार एकूण एफआरपीची रक्कम १९ हजार ६२३ कोटी ४३ लाख रुपये होते. त्यातील १४ हजार ८८१ कोटी (७६ टक्के) रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, ४ हजार ९२६ कोटी (२४ टक्के) रुपयांची रक्कम थकीत आहेत.करारानुसार शेतकऱ्यांना मिळणार ३१०० कोटीशुगर केन कंट्रोल आॅर्डर १९६६ नुसार एफआरपीसाठी राज्यातील २९ कारखान्यांनी शेतकºयांशी करार केले आहे. त्यानुसार शेतकºयांना ३१२७ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. अनेक कारखान्यांनी ७५ टक्के रक्कम सुरुवातीस, तर उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीला देण्याचा करार केला आहे.आणखी चार कारखान्यांवर आरआरसीची कारवाईवारंवार सांगूनही एफआरपीची रक्कम न देणाºया आणखी चार साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले आहे. त्यामुळे आरआरसी कारवाई केलेल्या कारखान्यांची संख्या ४९ झाली आहे. औरंगाबादचा घृष्णेश्वरकडे ३९.२५, सोलापूरच्या फॅबटेक ४६.०६, सांगलीच्या माणगंगाकडे ३.३६ आणि बीडच्या वैद्यनाथ कारखान्याकडे ३६.१० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र