शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

राज्यातील २७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी, १६६ कारखान्यांकडे थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 02:08 IST

राज्यातील केवळ २७ साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम दिलेली आहे.

पुणे : राज्यातील केवळ २७ साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम दिलेली आहे. अजूनही १६६ साखर कारखान्यांकडे ४ हजार ९२६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असून, १४ हजार ८८१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, साखर आयुक्तालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोरआली आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला उठाव नसल्याने बहुतांश कारखान्यांकडे एफआरपी थकीत होती. साखरेचा उत्पादन खर्च आणि साखरेची किमान आधारभूत किंमत यामध्ये चारशे ते साडेचारशेंचा फरक असल्याचे साखर कारखान्यांचे म्हणणे होते. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरुन ३५०० रुपये करावा अशी मागणी कारखान्यांनी केली होती. थकीत एफआरपीचा आकडा वाढल्याने, शेतकरी संघटनांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात साखर आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. अखेरीस केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपयांवरुन ३१०० रुपये केला.यंदाच्या गाळप हंगामानुसार राज्यात १५ फेब्रुवारीच्या गाळपानुसार १२ हजार ९४९ कोटी रुपयांची एफआरपी दिली होती. तर, ४ हजार ८६४ कोटी रुपये थकीत होते. तर, १५ मार्चच्या अहवालानुसार राज्यात ८३९.६९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यानुसार एकूण एफआरपीची रक्कम १९ हजार ६२३ कोटी ४३ लाख रुपये होते. त्यातील १४ हजार ८८१ कोटी (७६ टक्के) रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, ४ हजार ९२६ कोटी (२४ टक्के) रुपयांची रक्कम थकीत आहेत.करारानुसार शेतकऱ्यांना मिळणार ३१०० कोटीशुगर केन कंट्रोल आॅर्डर १९६६ नुसार एफआरपीसाठी राज्यातील २९ कारखान्यांनी शेतकºयांशी करार केले आहे. त्यानुसार शेतकºयांना ३१२७ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. अनेक कारखान्यांनी ७५ टक्के रक्कम सुरुवातीस, तर उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीला देण्याचा करार केला आहे.आणखी चार कारखान्यांवर आरआरसीची कारवाईवारंवार सांगूनही एफआरपीची रक्कम न देणाºया आणखी चार साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले आहे. त्यामुळे आरआरसी कारवाई केलेल्या कारखान्यांची संख्या ४९ झाली आहे. औरंगाबादचा घृष्णेश्वरकडे ३९.२५, सोलापूरच्या फॅबटेक ४६.०६, सांगलीच्या माणगंगाकडे ३.३६ आणि बीडच्या वैद्यनाथ कारखान्याकडे ३६.१० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्र