शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

आमची कामे होत नाहीत !

By admin | Updated: June 11, 2015 01:50 IST

शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असूनही कामे होत नाहीत, ही आमच्या आमदारांची तीव्र भावना आहे. साध्या बदल्या अन् प्रशासनाशी संबंधित कामांमध्येही त्यांना

मुंबई : शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असूनही कामे होत नाहीत, ही आमच्या आमदारांची तीव्र भावना आहे. साध्या बदल्या अन् प्रशासनाशी संबंधित कामांमध्येही त्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशी कैफियत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्यमंत्री संजय राठोड, दीपक केसरकर आणि दादा भुसे या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची दोन तास बैठक झाली. दोन दिवसांपूर्वी विधान भवनात झालेल्या बैठकीत आमदारांची कामे होत नसल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करण्यात आली होती. आपलीच कामे होत नसतील तर सरकारमध्ये राहायचे कशाला, असा सवालही आमदारांनी केला होता. या भावनेचे पडसाद मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकतही उमटले. सूत्रांनी सांगितले की मंत्रालयातील सचिव, अन्य अधिकारी तालुक्यापर्यंतच्या कामांचे आदेश स्वत:च्या अधिकारात अन् आमदारांना विश्वासात न घेता काढत आहेत. अधिकारी डोईजड होणार असतील तर त्यांना वेसण घालणे आवश्यक आहे, अशी भावना सेना मंत्र्यांनी व्यक्त केली. आमदारांचा मान राखला जाईल, त्यांच्या मतदारसंघात त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा, तालुकास्तरीय समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये शिवसेनेला डावलू नये. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील ६० टक्के नियुक्त्या शिवसेनेच्या कोट्यातून व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली. या सगळ्या तक्रारी आणि महामंडळ, समित्यांवरील नियुक्त्या आदी विषयांबाबत भाजपा-शिवसेना समन्वय समितीची बैठक येत्या दोन-तीन दिवसांत घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू आणि समन्वय समितीची लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)