शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आमची कामे होत नाहीत !

By admin | Updated: June 11, 2015 01:50 IST

शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असूनही कामे होत नाहीत, ही आमच्या आमदारांची तीव्र भावना आहे. साध्या बदल्या अन् प्रशासनाशी संबंधित कामांमध्येही त्यांना

मुंबई : शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असूनही कामे होत नाहीत, ही आमच्या आमदारांची तीव्र भावना आहे. साध्या बदल्या अन् प्रशासनाशी संबंधित कामांमध्येही त्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशी कैफियत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्यमंत्री संजय राठोड, दीपक केसरकर आणि दादा भुसे या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची दोन तास बैठक झाली. दोन दिवसांपूर्वी विधान भवनात झालेल्या बैठकीत आमदारांची कामे होत नसल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करण्यात आली होती. आपलीच कामे होत नसतील तर सरकारमध्ये राहायचे कशाला, असा सवालही आमदारांनी केला होता. या भावनेचे पडसाद मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकतही उमटले. सूत्रांनी सांगितले की मंत्रालयातील सचिव, अन्य अधिकारी तालुक्यापर्यंतच्या कामांचे आदेश स्वत:च्या अधिकारात अन् आमदारांना विश्वासात न घेता काढत आहेत. अधिकारी डोईजड होणार असतील तर त्यांना वेसण घालणे आवश्यक आहे, अशी भावना सेना मंत्र्यांनी व्यक्त केली. आमदारांचा मान राखला जाईल, त्यांच्या मतदारसंघात त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा, तालुकास्तरीय समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये शिवसेनेला डावलू नये. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील ६० टक्के नियुक्त्या शिवसेनेच्या कोट्यातून व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली. या सगळ्या तक्रारी आणि महामंडळ, समित्यांवरील नियुक्त्या आदी विषयांबाबत भाजपा-शिवसेना समन्वय समितीची बैठक येत्या दोन-तीन दिवसांत घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू आणि समन्वय समितीची लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)