शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
5
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
6
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
7
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
8
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
10
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
11
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
12
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
13
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
14
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
15
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
16
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
17
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
18
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
19
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
20
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे, भाजपमुळे देशाची जगात नामुष्की, उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 08:48 IST

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले.

औरंगाबाद : आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो परदेशात कचराकुंडीवर लावला जातो.  भाजपचा टिनपाट प्रवक्ता व भाजपच्या विद्यमान धोरणामुळे देशावर अपमानीत होण्याची वेळ आली, अशी घणाघाती टीका करतानाच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे, असे वक्तव्य औरंगाबादेत बुधवारी झालेल्या जाहीर सभेत केले. 

शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले. सत्तेत असूनही हिंदू हित साधले जात नसेल, काश्मीरमधील पंडित काश्मिरात राहू शकत नसतील, त्यांचे दिवसाढवळ्या मुडदे पडताना पाहून ढिम्म बसणारी भाजप नागरिकांना तुम्हाला अपेक्षित होती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, शिवसेनेचे कुणीही अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी आले नव्हते, असे फडणवीस सांगतात. परंतु मी त्यांना आठवण करून  देतो की, याच औरंगाबादेतून शिवसेनेचे तत्कालीन खासदार मोरेश्वर सावे शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. त्यांचे चिरंजीव अतुल सावे सध्या भाजपचे आमदार आहेत. मी या सावेंना विचारतो, अरे फडणवीसांना जाऊन सांगा, माझे बाबा अयोध्येला गेले होते. नसेल गेले तर तसेही सांगा.

ज्यांना शत्रू समजलाे ते मित्र झाले; अन् ३० वर्षांचा मित्र झाला हाडवैरीसध्या गाजणारा हिंदुत्वाचा मुद्दा धरून ते म्हणाले, आमचे हिंदुत्व कसे, हे मोजणारे तुम्ही कोण? ज्यांना आम्ही पंचवीस, तीस वर्ष मित्र म्हणालो, तेच आता हाडवैरी झाले व ज्यांची आम्ही संभावना शत्रू म्हणून केली त्यांनी मैत्रीचा हात पुढे करून उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्याची संधी दिली.भाजपची नाटके केवळ सत्तेसाठी विरोधी पक्षात असताना भाजप हिंदू हिताच्या घोषणा करीत होता. हिंदूंचे सणवार असतानाही महागाईविरुद्ध बंद घडवून आणत होता. आता महागाई प्रचंड वाढली आहे. रुपया दररोज गडगडतो आहे. पेट्रोलचे भाव ६० पैसे वाढले म्हणून बैलगाडीने संसदेत जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आम्हाला आता पाहायचा आहे, असे हिणवत ठाकरे म्हणाले, भाजपचे ही सर्व नाटके केवळ सत्तेसाठी होती, हे आता स्पष्ट दिसतेय. 

गुडघे टेकण्याची वेळ का आली?मध्य आशियातील मुस्लीम देशासमोर भारत देशाला गुडघे टेकण्याची वेळ का आली? भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देश अपमानीत झाला.  भाजपचीही वागणूक देशाला, महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे?     - उद्धव ठाकरे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद