शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे, भाजपमुळे देशाची जगात नामुष्की, उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 08:48 IST

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले.

औरंगाबाद : आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो परदेशात कचराकुंडीवर लावला जातो.  भाजपचा टिनपाट प्रवक्ता व भाजपच्या विद्यमान धोरणामुळे देशावर अपमानीत होण्याची वेळ आली, अशी घणाघाती टीका करतानाच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे, असे वक्तव्य औरंगाबादेत बुधवारी झालेल्या जाहीर सभेत केले. 

शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले. सत्तेत असूनही हिंदू हित साधले जात नसेल, काश्मीरमधील पंडित काश्मिरात राहू शकत नसतील, त्यांचे दिवसाढवळ्या मुडदे पडताना पाहून ढिम्म बसणारी भाजप नागरिकांना तुम्हाला अपेक्षित होती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, शिवसेनेचे कुणीही अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी आले नव्हते, असे फडणवीस सांगतात. परंतु मी त्यांना आठवण करून  देतो की, याच औरंगाबादेतून शिवसेनेचे तत्कालीन खासदार मोरेश्वर सावे शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. त्यांचे चिरंजीव अतुल सावे सध्या भाजपचे आमदार आहेत. मी या सावेंना विचारतो, अरे फडणवीसांना जाऊन सांगा, माझे बाबा अयोध्येला गेले होते. नसेल गेले तर तसेही सांगा.

ज्यांना शत्रू समजलाे ते मित्र झाले; अन् ३० वर्षांचा मित्र झाला हाडवैरीसध्या गाजणारा हिंदुत्वाचा मुद्दा धरून ते म्हणाले, आमचे हिंदुत्व कसे, हे मोजणारे तुम्ही कोण? ज्यांना आम्ही पंचवीस, तीस वर्ष मित्र म्हणालो, तेच आता हाडवैरी झाले व ज्यांची आम्ही संभावना शत्रू म्हणून केली त्यांनी मैत्रीचा हात पुढे करून उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्याची संधी दिली.भाजपची नाटके केवळ सत्तेसाठी विरोधी पक्षात असताना भाजप हिंदू हिताच्या घोषणा करीत होता. हिंदूंचे सणवार असतानाही महागाईविरुद्ध बंद घडवून आणत होता. आता महागाई प्रचंड वाढली आहे. रुपया दररोज गडगडतो आहे. पेट्रोलचे भाव ६० पैसे वाढले म्हणून बैलगाडीने संसदेत जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आम्हाला आता पाहायचा आहे, असे हिणवत ठाकरे म्हणाले, भाजपचे ही सर्व नाटके केवळ सत्तेसाठी होती, हे आता स्पष्ट दिसतेय. 

गुडघे टेकण्याची वेळ का आली?मध्य आशियातील मुस्लीम देशासमोर भारत देशाला गुडघे टेकण्याची वेळ का आली? भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देश अपमानीत झाला.  भाजपचीही वागणूक देशाला, महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे?     - उद्धव ठाकरे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद