शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे, भाजपमुळे देशाची जगात नामुष्की, उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 08:48 IST

Uddhav Thackeray : शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले.

औरंगाबाद : आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो परदेशात कचराकुंडीवर लावला जातो.  भाजपचा टिनपाट प्रवक्ता व भाजपच्या विद्यमान धोरणामुळे देशावर अपमानीत होण्याची वेळ आली, अशी घणाघाती टीका करतानाच राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आमचे हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे, असे वक्तव्य औरंगाबादेत बुधवारी झालेल्या जाहीर सभेत केले. 

शिवसेनेच्या मराठवाडा शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित स्वाभिमान सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोले लगावले. सत्तेत असूनही हिंदू हित साधले जात नसेल, काश्मीरमधील पंडित काश्मिरात राहू शकत नसतील, त्यांचे दिवसाढवळ्या मुडदे पडताना पाहून ढिम्म बसणारी भाजप नागरिकांना तुम्हाला अपेक्षित होती का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, शिवसेनेचे कुणीही अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी आले नव्हते, असे फडणवीस सांगतात. परंतु मी त्यांना आठवण करून  देतो की, याच औरंगाबादेतून शिवसेनेचे तत्कालीन खासदार मोरेश्वर सावे शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. त्यांचे चिरंजीव अतुल सावे सध्या भाजपचे आमदार आहेत. मी या सावेंना विचारतो, अरे फडणवीसांना जाऊन सांगा, माझे बाबा अयोध्येला गेले होते. नसेल गेले तर तसेही सांगा.

ज्यांना शत्रू समजलाे ते मित्र झाले; अन् ३० वर्षांचा मित्र झाला हाडवैरीसध्या गाजणारा हिंदुत्वाचा मुद्दा धरून ते म्हणाले, आमचे हिंदुत्व कसे, हे मोजणारे तुम्ही कोण? ज्यांना आम्ही पंचवीस, तीस वर्ष मित्र म्हणालो, तेच आता हाडवैरी झाले व ज्यांची आम्ही संभावना शत्रू म्हणून केली त्यांनी मैत्रीचा हात पुढे करून उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्याची संधी दिली.भाजपची नाटके केवळ सत्तेसाठी विरोधी पक्षात असताना भाजप हिंदू हिताच्या घोषणा करीत होता. हिंदूंचे सणवार असतानाही महागाईविरुद्ध बंद घडवून आणत होता. आता महागाई प्रचंड वाढली आहे. रुपया दररोज गडगडतो आहे. पेट्रोलचे भाव ६० पैसे वाढले म्हणून बैलगाडीने संसदेत जाणारे अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आम्हाला आता पाहायचा आहे, असे हिणवत ठाकरे म्हणाले, भाजपचे ही सर्व नाटके केवळ सत्तेसाठी होती, हे आता स्पष्ट दिसतेय. 

गुडघे टेकण्याची वेळ का आली?मध्य आशियातील मुस्लीम देशासमोर भारत देशाला गुडघे टेकण्याची वेळ का आली? भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देश अपमानीत झाला.  भाजपचीही वागणूक देशाला, महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे?     - उद्धव ठाकरे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद