शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही – अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 18:50 IST

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप  देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत सांगितले.

उस्मानाबाद ( भूम ) : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप  देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस होता आणि भूम येथे ही जाहीर सभा पार पडली. तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घेवून सुरु झालेली हल्लाबोल यात्रेला पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तसाच दुसऱ्यादिवशीच्या या हल्लाबोल यात्रेला प्रतिसाद मिळाला. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, रामराव वडकुते, आमदार विदया चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, जीवनराव गोरे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, सुरेखा ठाकरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे,अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफार मलिक आदी उपस्थित होते.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ७१ हजार कोटीची कर्जमाफी दिली परंतु या सरकारने अजुनपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. या सरकारच्या कालावधी पहिल्यांदा शेतकरी संपावर गेला. या सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफी करण्यासंदर्भात पवार साहेबांचा सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा असे सांगितले होते. मात्र त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केले आणि त्यानंतर कर्जमाफीची काय अवस्था आहे. सगळाच शेतकरी माझा मग प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव कशासाठी परंतु हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करताना दिसत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

आज कुठल्याही निवडणूका आलेल्या नाहीत परंतु आपण एकत्र आलो आहोत. आपला शेतकरी मोडला तर राज्य उध्वस्त होईल. बाजार उध्वस्त होईल आणि आर्थिक कंबरडे मोडून पडेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा घाट हे सरकार घालत आहे. कुठे घेवून चाललाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले. शिवसेना पक्ष कसा चुकीच्या पध्दतीने जातोय याचे उदाहरणासह दाखले दिले. आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्दयांना हात घातला आणि ते मुद्दे कशापध्दतीने सोडवले गेले पाहिजे याची गणिते मांडली. शिवाय पत्रकारितेला मॅनेज करण्याची भाषा या सरकारकडून कशी होत आहे त्यामुळे लोकशाहीच्या या घटकाला कशी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे लोकशाही कशी टिकणार, कसा सव्वा कोटीचा देश पुढे जाणार असा सवालही अजित पवार यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कारभारावर टिकेची झोड उठवली.

या सभेमध्ये पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या भाषणामध्ये हे सरकार शेतकऱ्यांची छळवणूक करत आहे. त्यांच्याशी बेईमानी करत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे. ही हल्लाबोल यात्रा ही जनतेची आहे. त्यामुळेच ही हल्लाबोल यात्रा एक मोठे रुप धारण करत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांनी हिंदीतून भाषण केले ते सर्वांनाच भावले.

सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र ऑनलाईन घोटाळ्यामुळे एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नाही.दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ऑनलाईनचे बोगस काम करणाऱ्या इनोवेव्ह कंपनीला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप विधानपरिशदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.सरकारने जाहिरातीवरही ३०० कोटीची उधळपट्टी केल्याचा आरोप करताना भाजप-सेना हे दोन जनतेला भासवणारे महा ठग असल्याचा टोला लगावला.

सभेचे प्रास्ताविक आमदार राहुल मोटे यांनी केले. तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर टिकेची झोड उठवली. दुसऱ्यादिवशी भूममध्ये झालेल्या जाहीर सभेलाही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार