शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही – अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 18:50 IST

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप  देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत सांगितले.

उस्मानाबाद ( भूम ) : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप  देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा आज दुसरा दिवस होता आणि भूम येथे ही जाहीर सभा पार पडली. तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घेवून सुरु झालेली हल्लाबोल यात्रेला पहिल्या दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला. तसाच दुसऱ्यादिवशीच्या या हल्लाबोल यात्रेला प्रतिसाद मिळाला. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, रामराव वडकुते, आमदार विदया चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, जीवनराव गोरे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, सुरेखा ठाकरे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे,अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफार मलिक आदी उपस्थित होते.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ७१ हजार कोटीची कर्जमाफी दिली परंतु या सरकारने अजुनपर्यंत कर्जमाफी दिलेली नाही. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते. या सरकारच्या कालावधी पहिल्यांदा शेतकरी संपावर गेला. या सरकारचे प्रतिनिधी कर्जमाफी करण्यासंदर्भात पवार साहेबांचा सल्ला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पवार साहेबांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा असे सांगितले होते. मात्र त्यांनी आपल्या निर्णयामध्ये बदल केले आणि त्यानंतर कर्जमाफीची काय अवस्था आहे. सगळाच शेतकरी माझा मग प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव कशासाठी परंतु हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये भेदभाव करताना दिसत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

आज कुठल्याही निवडणूका आलेल्या नाहीत परंतु आपण एकत्र आलो आहोत. आपला शेतकरी मोडला तर राज्य उध्वस्त होईल. बाजार उध्वस्त होईल आणि आर्थिक कंबरडे मोडून पडेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा घाट हे सरकार घालत आहे. कुठे घेवून चाललाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे.

अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले. शिवसेना पक्ष कसा चुकीच्या पध्दतीने जातोय याचे उदाहरणासह दाखले दिले. आपल्या भाषणामध्ये अनेक मुद्दयांना हात घातला आणि ते मुद्दे कशापध्दतीने सोडवले गेले पाहिजे याची गणिते मांडली. शिवाय पत्रकारितेला मॅनेज करण्याची भाषा या सरकारकडून कशी होत आहे त्यामुळे लोकशाहीच्या या घटकाला कशी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे लोकशाही कशी टिकणार, कसा सव्वा कोटीचा देश पुढे जाणार असा सवालही अजित पवार यांनी केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कारभारावर टिकेची झोड उठवली.

या सभेमध्ये पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या भाषणामध्ये हे सरकार शेतकऱ्यांची छळवणूक करत आहे. त्यांच्याशी बेईमानी करत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे. ही हल्लाबोल यात्रा ही जनतेची आहे. त्यामुळेच ही हल्लाबोल यात्रा एक मोठे रुप धारण करत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांनी हिंदीतून भाषण केले ते सर्वांनाच भावले.

सरकारने ऑनलाईन कर्जमाफी जाहीर केली मात्र ऑनलाईन घोटाळ्यामुळे एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नाही.दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ऑनलाईनचे बोगस काम करणाऱ्या इनोवेव्ह कंपनीला १०० कोटी रुपये दिल्याचा आरोप विधानपरिशदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.सरकारने जाहिरातीवरही ३०० कोटीची उधळपट्टी केल्याचा आरोप करताना भाजप-सेना हे दोन जनतेला भासवणारे महा ठग असल्याचा टोला लगावला.

सभेचे प्रास्ताविक आमदार राहुल मोटे यांनी केले. तर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारवर टिकेची झोड उठवली. दुसऱ्यादिवशी भूममध्ये झालेल्या जाहीर सभेलाही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार