शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सेंद्रिय सीताफळाच्या बागेने फुलविला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:12 IST

यशकथा  : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शेतकऱ्याने सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या सीताफळाला मोठी मागणी मिळत आहे.

- शिवाजी पवार (श्रीरामपूर)

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शेतकऱ्याने सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या सीताफळाला मोठी मागणी मिळत आहे. अवघ्या पाऊण एकरामध्ये वर्षाला एक लाख रुपये मिळकत होत आहे. विशेष म्हणजे सर्व मालाची महामार्गावर स्वत: हात विक्री करीत कष्टाने संसार फुलविल्याचा आदर्श त्याने उभा केला. मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेल्या संजय शंकरराव वाघुले यांची ही यशोगाथा आहे.

शारीरिक व्याधीने त्रस्त झाल्याने त्यांनी फळबाग लागवड व विक्रीचा मार्ग शोधला. महामार्गावर शेती असल्याने त्याचा अचूक लाभ उठविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मात्र त्यामागे उत्तम नियोजन असल्याचे दिसून येते. मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी त्यांची जमीन आहे. सोळा बाय सोळा फुटांवर १२० झाडांची त्यांनी लागवड केली आहे. एका झाडाला २० किलोप्रमाणे फळ मिळत आहे. सध्या तीन वर्षापासून उत्पादन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या मुंबई, पुणेसह परराज्यात सीताफळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याला किंमत चांगली मिळते. सीताफळापासून अनेकांना चांगला रोजगार मिळत आहे. टाकळीभान शिवारात श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर शेताच्या समोरच बसून संजय वाघुले हे स्वत: हात विक्री करतात. ५० ते ७० रुपये किलोप्रमाणे फळाला मागणी आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये एक लाख रुपयांवर उत्पन्न घेत असल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षी उत्पन्नात आणखी वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले. बागेला ठिबक सिंचनने पाणी दिले जाते. सीताफळाचे वैैशिष्ट्य म्हणजे या पिकावर मिलीबग या रसशोषक किडीवगळता अन्य कोणताही प्रादुर्भाव होत नाही. मिलीबगवर मिरची पावडर व पाण्याची फवारणी करून नियंत्रण मिळविल्याचे वाघुले यांनी सांगितले.

केवळ लेंडी खतावरच बाग फुलविली आहे. अन्य कुठलीही खते दिली जात नाहीत. या झाडांना शेळ्या-मेंढ्यांपासून कुठलाही उपद्रव होत नाही. अपरिपक्व फळांची चोरी देखील होऊ शकत नाही. त्यामुळेच आपण सीताफळाकडे वळाल्याचे वाघुले यांनी  सांगितले. सध्या बाजारामध्ये सर्वच फळांच्या घाऊक व किरकोळ दरामध्ये मोठी तफावत आहे़ उदाहरणच द्यायचे झाल्यास आंबा व सीताफळाचे देता येईल. आंबा हा ३० ते ३५ रुपये किलो दराने विकला जातो.

मात्र, आंबे शंभर ते दीडशे रुपये किलोने विकले जातात. सीताफळाचेही तसेच आहे. दोनशे ते तीनशे रुपये क्रेटने (२०किलो) घाऊक दारात विक्री होणाऱ्या सीताफळाच्या खरेदीसाठी ग्राहकांना किलोमागे ५० ते ६० रुपये मोजावेच लागतात. यावर एक उपाय म्हणजे ग्राहकांनी शक्य तेवढ्याप्रसंगी थेट शेतकऱ्यांकडूनच माल खरेदी केला पाहिजे. तो देखील फारच कमी दरात मिळण्याची अपेक्षा ठेऊ नये. या गोष्टींचा सार काढायचा ठरल्यास टाकळीभान येथील या कष्टाळू शेतकऱ्याला दाद द्यायला हवी. स्वत:पुरते का होईना त्याने रोजगार निर्मिती केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी