शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

वर्षभरापासून अवयव प्रत्यारोपणाचा टक्का वाढला

By admin | Updated: August 24, 2016 02:35 IST

यंदा साडेसात महिन्यांतच अवयवदानाचा आकडा हा ४१वर पोहोचला आहे.

मुंबई : यंदा साडेसात महिन्यांतच अवयवदानाचा आकडा हा ४१वर पोहोचला आहे. शनिवारी रात्री झालेल्या अवयवदानामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. व्यक्तीचा मेंदू मृतावस्थेत गेल्यास त्या व्यक्तीचे अवयव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करणे शक्य असते. याविषयी गेल्या काही वर्षांपासून महापालिका आणि राज्य सरकार जनजागृती करीत आहे. गेल्या तीन वर्षांत या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.अवयवदानासाठी जनजागृती मोहिमेला यश आल्याचे चित्र गेल्या तीन वर्षांत दिसत आहे. गेल्या वर्षी एकूण ४२ जणांनी अवयवदान केले होते. यंदा आॅगस्ट महिन्यापर्यंतच ४१ जणांनी अवयवदान केले आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत अजून अवयवदान होऊन आत्तापर्यंत सर्वाधिक अवयवदान या वर्षांत होईल अशी आशा मुंबईच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने व्यक्त केली आहे. अवयवांच्या प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी मोठी आहे. पण, त्या प्रमाणात अवयवदान होत नाही. नानावटी रुग्णालयात शनिवारी एका महिलेचे मूत्रपिंड दान केल्यामुळे एका व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे. गुरुवारी मालाड येथे ५५ वर्षीय महिलेला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला ब्रेन हॅमरेज झाले होते. उपचारादरम्यान या महिलेचा मेंदू मृतावस्थेत गेला. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. एक मूत्रपिंड दान करण्यात आले. (प्रतिनिधी)