शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

साताऱ्यातील मनोज जरांगेंच्या सभेला विरोध; मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाणांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 15:58 IST

मराठा हा समाज आहे, कुणबी ही जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०० पैकी केवळ ५ टक्के कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे विनाकारण ९५ टक्के मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा जरांगेंनी प्रयत्न करू नये असं तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सातारा – राज्यभरात मराठा आरक्षणाचे नेतृत्व उभारणारे मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात जरांगे पाटील ठिकठिकाणी सभा घेणार आहेत. परंतु सातारा येथील जरांगेच्या सभेवरून वाद निर्माण झाले आहे. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते. परंतु याठिकाणी जरांगे पाटलांनी साताऱ्यात अन्यत्र सभा घ्यावी परंतु शिवतीर्थ इथं सभा घेऊ नये असं मराठा आंदोलन तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या की, शिवतीर्थ इथं सभा घेण्याचा नवीन पायंडा पाडू नका, तुम्ही एवढं मोठा गड जिंकलेला नाही. मराठा समाजाचे अस्तित्वच मिटवायला जरांगे पाटील लागले आहे. मराठा हा कुणबी नाही. मराठा समाजाला तुम्ही भडकवत आहात. मराठा समाज शेतकरी आहे असं बोलता, परंतु शेतकरी हे सर्व जातीत आहेत. विनाकारण मराठा समाजाचा बाणा, ९६ कुळी मराठ्यांचे अस्तित्व नष्ट करून तुम्ही ओबीसीमध्ये ज्या जाती आहेत त्या सर्वांना तुम्ही रोडवर आणण्याचा प्रयत्न करताय असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत आज सगळ्या समाजातील लोक रस्त्यावर आले तर आरक्षण मिळणार कुणाला? मराठा हा समाज आहे, कुणबी ही जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०० पैकी केवळ ५ टक्के कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे विनाकारण ९५ टक्के मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा जरांगेंनी प्रयत्न करू नये. ओबीसीत आम्हाला आरक्षण नको, ते आमचेच बांधव आहे. मराठा समाज हा मोठ्या भावाप्रमाणे वागत आला आहे. अजूनही वेळ गेली नाही, मराठा समाजासाठी लढा, कायद्याने लढा, बेकायदेशीरपणे कुणबी प्रमाणपत्रे घेतली तर कोर्टात ते टिकणार नाही. जर आरक्षणाचा मुद्दा त्याच टप्प्यावर येऊन थांबणार असेल तर सरकारकडे काय मागितले पाहिजे हे ठरवा असं तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या ही भूमिकाच चुकीची आहे. जो माणूस आजपर्यंत गेल्या २ महिन्यात सात वेळा विधाने बदलतो, तो समाजासाठी योग्य नाही. जरांगे पाटील यांनी कुणबी म्हणजे मराठा आहे, त्यामुळे समाजाची दिशाभूल झाली आहे. जो ९६ कुळी मराठा आहे त्या समाजाने काय करायचे, मराठ्यांनी कुणबी व्हावं हे तुम्ही सभेत सांगणार का? आम्हाला कुणबी व्हायचे नाही. त्यामुळे तुम्हाला यायचे असेल या, परंतु शिवतीर्थ इथं सभा होऊ देणार नाही, जर कुणी परवानगी दिली तर त्याठिकाणी मी आमरण उपोषणाला बसणार आहे असंही तेजस्विनी चव्हाण यांनी इशारा दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील