शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रवादीला पुन्हा उभं करण्यासाठी मिळणार तरुणांना संधी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 14:56 IST

वैभव पिचड, संग्राम जगताप आणि शिवेंद्रसिंह राजे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तरुणांना संधी देणार असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्ताधारी भाजप पक्षात सामील होण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतील २० हून अधिक नेत्यांनी पक्षांतर केले असून आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याने राष्ट्रवादीची वाताहत झाली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला पुन्हा उभं करण्याचं आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे. त्यावर तोडगा काढण्यास राष्ट्रवादीमध्ये तयारी सुरू झाल्याचे समजते.

दिग्गज नेत्यांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधून तरुण नेते देखील वेगळे होत आहेत. वैभव पिचड, संग्राम जगताप आणि शिवेंद्रसिंह राजे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तरुणांना संधी देणार असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच तरुणांना आगामी विधानसभेत संधी देणार असल्याचे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा निकष असला तरी पक्षाकडून तरुणांना संधी देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. तसेच तरुणांना संधी दिल्याने पक्षाला पुन्हा नव्या दमाने उभं करण्यास मदतच होईल, असंही त्यांनी सांगितले.

याआधी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील तरुणांना संधी देणार असल्याचे म्हटले होते. मला इच्छूक तरुणांची यादी द्या, त्यांना तिकीट देतो, असंही पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीकडून तरुण नेते निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या पक्षांतरामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे.