शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विदर्भात विरोधकांनी खाते उघडले; काँग्रेसला मिळाली एकमेव जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 05:32 IST

२०१४ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्व दहा जागांवर कब्जा करणाऱ्या भाजप- सेना युतीला यंदा मोदी त्सुनामीचा हवा तसा लाभ मिळाला नाही.

- गजानन चोपडे२०१४ च्या निवडणुकीत विदर्भातील सर्व दहा जागांवर कब्जा करणाऱ्या भाजप- सेना युतीला यंदा मोदी त्सुनामीचा हवा तसा लाभ मिळाला नाही. चंद्रपूर आणि अमरावतीत दोन दिग्गज नेत्यांचा पराभव युतीच्या जिव्हारी लागला आहे. चुकलेल्या नियोजनामुळे दोन जागा गमावण्याची नामुष्की युतीवर ओढवली. केंद्रिय मंत्री हंसराज अहिर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ या दोन दिग्गजांच्या पराभवामुळे युतीच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला खरा; पण नागपूरकरांनी जातीच्या राजकारणाला न जुमानता विकासावर शिक्कामोर्तब करीत गडकरी यांना मताधिक्याने निवडून आणले. पटोले यांनी डीएमके (दलित, मुस्लीम, कुणबी) कार्ड खेळण्याचा केलेला प्रयत्न येथे चांगलाच फसला.

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांच्या पुढाकाराने किशोर गजभिये यांना उमेदवारी मिळाली. परंतु काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचा दारूण पराभव झाला. येथेही जातीचे कार्ड चालविण्याचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला आणि सतत संपर्कात असणारे शिवसेनेचे कृपाल तुमाने दुसऱ्यांदा संसदेत पोहोचले. भाजपच्या मजबूत संघटनेचा लाभ तुमाने यांना मिळाला.

भंडारा- गोंदिया मतदारसंघात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणणाºया मतदारांनी यंदा मात्र पुन्हा भाजपला संधी दिली. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि काँग्रेस पक्षाने इमानेइतबारे दिलेली साथही राष्टÑवादीच्या नाना पंचबुद्धे यांच्या कामी आली नाही. उलट भाजपने दिलेल्या तरूण चेहºयाला मतदारांनी पसंती देत ही जागा भाजपच्या खात्यात टाकली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार परिणय फुके यांनी केलेल्या योग्य नियोजनाचा लाभ सुनील मेंढे यांना झाला आणि ते नगराध्य पदावरून थेट खासदार झाले.गडचिरोलीत काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांचा विजय निश्चित मानला जात असताना भाजपने मात्र ७७ हजार मतांची आघाडी घेत बाजी मारली. खासदारकीची माळ पुन्हा अशोक नेते यांच्या गळ्यात पडली. वर्धा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. मागील पाच वर्षातील सततचा जनसंपर्क आणि विकास कामांकडे दिलेले लक्ष त्यांच्या कामी आले.

महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांना पराभवाचा सामना करावा लागला. पक्षांतर्गत गटबाजी आणि बाहेरचा उमेदवार हे काँग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण येथे मानले जात आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करीत शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा संसदेत पोहोचल्या आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार पी.बी. आडे रिंगणात असल्याने युतीला त्याचा फटका बसण्याची भीती होती मात्र मतदारांनी गवळी यांच्याच गळ्यात विजयाची माळ टाकली. अकोला मतदारसंघातून सतत चवथ्यांदा लोकसभेत पोहचलेले संजय धोत्रे यांनी आपल्या विरोधात जनमानसात विरोधी वातावरण तयार होणार नाही, याची काळजी घेतली. नेमकी हीच त्यांची जमेची बाजू ठरली. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला. बुलडाण्यातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनीदेखील विजयाची हॅटट्रीक केली. बुलडाणा मतदारसंघातून तिसºयांदा विजयी होणारे ते दुसरे खासदार ठरले आहे.चंद्रपूर, अमरावतीत बदलचंद्रपूर मतदारसंघाचा निकाल युतीला धक्का देणारा ठरला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये सलग विजय संपादन करणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा काँग्रेसचे सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी पराभव केला. सर्वत्र मोदी लाट असताना चंद्रपूरकरांनी मात्र यंदा नव्या चेहºयाला संधी दिली. विशेष म्हणजे धानोरकर हे महाराष्टÑातून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव उमेदवार आहेत. हाच बदल अमरावती मतदार संघातही दिसून आला. मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांनी यंदा मात्र शिवसेनेचे हेविवेट नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करीत संसदेत शानदार एन्ट्री केली आहे.