शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाचला पाढा; शिंदे-भाजप सरकारची आजपासून पहिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 06:58 IST

Maharashtra : विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला.

मुंबई : सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी आणि राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. हे सरकारच मुळात लोकशाही, संसदीय पंरपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. यासंदर्भात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.

 हेक्टरी ७५ हजार मदत द्याविदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिलेली नसल्याची टीका करत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार आणि फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत द्यावी. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी या पत्रात केली आहे. 

 समित्यांना स्थगिती कशासाठी?या सरकारने छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊं माँसाहेब यांच्या स्मारकांच्या विकासकामांना आणि समित्यांना स्थगिती दिली. महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समिती बरखास्त केली. राज्याचे मुख्यमंत्री कुणाच्यातरी दबावाखाली असल्याने लोकोपयोगी निर्णय, विकास योजनांना स्थगिती देत आहेत.तांदूळ, डाळी, पीठ, दुध, दही, पनीरसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय व आपण त्याला न केलेला विरोध हा राज्य सरकारची अगतिकता आहे.

वादग्रस्त मंत्र्यांच्या चौकशीची  विरोधकांची मागणीटीईटी परीक्षा गैरव्यवहारात सत्तारुढ गटातील नेत्याच्या मुलांवर गंभीर आरोप होत असताना त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील नव्या १८ पैकी १५ मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, याकडेही विरोधकांनी पत्रात लक्ष वेधले आहे.

राज्यपालही टार्गेटराज्यपालांकडून महाराष्ट्राबद्दल, महापुरुषांबद्दल केलेली वक्तव्ये सहन करणे शक्य नाही. राज्यपालांच्या वक्तव्यांची आपल्याकडून होत असलेली पाठराखण सहन केली जाणार नाही, असा इशारा विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण