शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाचला पाढा; शिंदे-भाजप सरकारची आजपासून पहिली परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 06:58 IST

Maharashtra : विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला.

मुंबई : सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी आणि राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. हे सरकारच मुळात लोकशाही, संसदीय पंरपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधीमान्य नाही, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवून विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. यासंदर्भात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर पत्र पाठवले आहे.

 हेक्टरी ७५ हजार मदत द्याविदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र या सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत दिलेली नसल्याची टीका करत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार आणि फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत द्यावी. विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांनी या पत्रात केली आहे. 

 समित्यांना स्थगिती कशासाठी?या सरकारने छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊं माँसाहेब यांच्या स्मारकांच्या विकासकामांना आणि समित्यांना स्थगिती दिली. महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समिती बरखास्त केली. राज्याचे मुख्यमंत्री कुणाच्यातरी दबावाखाली असल्याने लोकोपयोगी निर्णय, विकास योजनांना स्थगिती देत आहेत.तांदूळ, डाळी, पीठ, दुध, दही, पनीरसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय व आपण त्याला न केलेला विरोध हा राज्य सरकारची अगतिकता आहे.

वादग्रस्त मंत्र्यांच्या चौकशीची  विरोधकांची मागणीटीईटी परीक्षा गैरव्यवहारात सत्तारुढ गटातील नेत्याच्या मुलांवर गंभीर आरोप होत असताना त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील नव्या १८ पैकी १५ मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, याकडेही विरोधकांनी पत्रात लक्ष वेधले आहे.

राज्यपालही टार्गेटराज्यपालांकडून महाराष्ट्राबद्दल, महापुरुषांबद्दल केलेली वक्तव्ये सहन करणे शक्य नाही. राज्यपालांच्या वक्तव्यांची आपल्याकडून होत असलेली पाठराखण सहन केली जाणार नाही, असा इशारा विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण