शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण? शिंदे गटाचा दावा, कायदेतज्ज्ञ म्हणाले, “आता इतकी संख्या आवश्यक...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:09 IST

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: ऑपरेशन धनुष्यबाण यशस्वी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला आता ठाकरे गटातील खासदारांची किती मॅजिक फिगर लागेल?

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: ठाकरे गटाच्या ४, काँग्रेसच्या ५ आमदारांनी व ठाकरे गटाच्या ३ खासदारांनी गेल्या १५ दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. याचबरोबर ठाकरे गटाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे शिवसेनेत सामील होतील, असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला होता. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही मोठा दावा केला आहे. यावरून आता कायदेतज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे. 

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मेळावे होत आहेत. यानिमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट शक्तिप्रदर्शन करत आहे. यातच या मेळाव्यात किंवा या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण राबवले जाऊ शकते. ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसतच असून, राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ऑपरेशन धनुष्यबाणवरून मोठा दावा केला आहे. 

काय म्हणाले संजय शिरसाट?

माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला होता. मात्र ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षप्रवेशांवर तांत्रिक अडचणींच्या शक्यतेमुळे शिंदे गटाने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यानंतर आता संजय शिरसाट म्हणाले की, ऑपरेशन हे सांगून केले जात नाही. ऑपरेशन हे ऐनवेळी केले जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशनची सूचना ज्या दिवशी देतील, त्या दिवशी ते ऑपरेशन यशस्वी करायचे काम आम्ही करू. अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. हे तुम्हाला काही दिवसांत दिसेल. परंतु, योग्य वेळ यावी लागेल. यासाठी जी मॅजिक फिगर लागते. ती मॅजिक फिगर मॅच झाली की, ऑपरेशन यशस्वी होईल, असे स्पष्ट सूतोवाच संजय शिरसाट यांनी केले.

मॅजिक फिगरसाठी आता ठाकरे गटातील किती संख्याबळ आवश्यक?

विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. वेगळा गट स्थापन करून ते विलीन होऊ शकतील. वेगळा गट शिवसेनेत विलीन झाला पाहिजे, अशी तरतूद कायद्यात आहे. पण ते ६ खासदार असतील तरच हे होईल. पक्षातून काही आमदार वेगळे झाले होते आणि आमचाच मूळ पक्ष आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार गट स्थापन होत किंवा ६ खासदार शिवसेनेत विलीन करावे लागतील. सहा खासदारांहून कमी असले तर अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होईल आणि खासदारकी जाईल. सहा किंवा जास्त असेल तरच मर्जरची प्रोव्हिजन होऊन प्रक्रिया होऊ शकेल. राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जाणे हा एक उत्तम पर्याय आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, आता जो कायदा आहे, तो चांगल्या प्रकारे इन्टरप्रिट झालेला नाही. कायद्याच्या इन्टरप्रिटेशन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे. यासंदर्भातील प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. कायद्याचा अर्थ नीट लावला गेला तर अनेक प्रश्न सुटू शकतील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कमिटी स्थापन केली होती. फाटाफूट पुन्हा झाली तर एखाद्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल तेव्हा कायदा कसा इन्टरप्रिट केला जातो हे महत्त्वाचे असेल, अशी माहिती देण्यात आली.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे