मुक्त विद्यापीठाचे ‘विशाखा’, ‘रुक्मिणी’ पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: February 15, 2016 20:29 IST2016-02-15T20:29:09+5:302016-02-15T20:29:09+5:30
येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रतील उल्लेखनीय योगदानासाठीचे 2015 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मुक्त विद्यापीठाचे ‘विशाखा’, ‘रुक्मिणी’ पुरस्कार जाहीर
> नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रतील उल्लेखनीय योगदानासाठीचे 2015 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘विशाखा’ व ‘रुक्मिणी’ पुरस्काराचे वितरण 12 मार्चला, तर डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार व बाबूराव बागुल पुरस्काराचे वितरण 21 एप्रिल रोजी होईल.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे ‘विशाखा’ काव्य पुरस्कार दिले जातात. त्यात 21 हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार नेरूर (कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील कवी अरुण नाईक यांच्या ‘अंधारवतरुळातील वेदनापट’, 15 हजारांचा द्वितीय पुरस्कार लोणंद (माळशिरस, पुणे) येथील कवयित्री बालिका बिटले यांच्या ‘मॅगेङिानीतून सुटतेय गोळी’ तर 10 हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार जळगाव येथील कवयित्री तथा ‘लोकमत’च्या वरिष्ठ मुद्रितशोधक डॉ. अस्मिता गुरव यांच्या ‘तूर्त इतकंच’ काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर तर प्रेरणा केशव सहाणो (सांगवी, पुणो) यांना रुक्मिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 21 हजार रुपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. साहित्यिक बाबूराव बागुल कथालेखन पुरस्कारासाठी गोंदी (अंबड, जालना) येथील विजय जाधव यांच्या ‘दाखला’ कथासंग्रहाची निवड झाली आहे. (प्रतिनिधी)