शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणातील उघडी पुरातन मंदिरे पुन्हा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:53 IST

उजनी भरले ९३ टक्के; ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप 

ठळक मुद्देपुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होतीपोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होतेपावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली

 करमाळा : तब्बल चार महिने मृत साठ्यात असलेले उजनी धरण गत सप्ताहात उपयुक्त पाणीसाठ्यात आल्याने पाण्याबाहेर उघडे पडलेले पुरातन पळसदेवाचे मंदिर, इनामदाराचा वाडा, ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप झाले आहेत.

गतवर्षी उजनी धरण ११० टक्के भरले, पण सर्वदूर कमी पर्जन्यमान झाल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वारंवार सोडण्यात आल्याने यंदा उजनी धरणातील पाणीपातळी वजा ५९ पर्यंत जाऊन पोहोचली होती. उजनी धरण निर्मितीवेळी तालुक्यातील वांगी, चिखलठाण, कुगाव, कंदर, पारेवाडी, सांगवी, ढोकरी, टाकळी, कोंढारचिंचोली, सोगाव, कात्रज, खातगाव या गावांचे पुनर्वसन झाले. दरम्यान, उठलेल्या गावातील पुरातन अवशेष त्यावेळी पाण्यात गडप झाले.

उजनी धरणातील पाणी यंदा एप्रिलमध्ये मृतपातळीमध्ये गेले. यामुळे पाण्यात लपलेली पुरातन अवशेष बाहेर डोकावू लागली. त्यामध्ये कुगावच्या जुन्या गावठाणातील इनामदारांच्या वाड्याचा समावेश होता. या इनामदारांच्या वाड्यात तरुणाईला वेड लावणाºया नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होते. 

पुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होती. गेल्या महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात व त्यानंतर तीन दिवसांत पुणे परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने पुणे भागातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येऊन धरण मायनसमधून प्लसमध्ये आले. गेल्या चार दिवसांत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली आहेत.

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा झाल्याने व धरणात श्ांभर टक्के पाणीसाठा होणार असल्याने पुनर्वसित शेतकºयांतून आनंद व्यक्त होत असून, धरण व नदीपात्रात पाणी वाढल्याने पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेऊ लागले आहेत. प्रा. शिवाजीराव बंडगर,अध्यक्ष, उजनी धरण पुनर्वसन संघर्ष समिती

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकfloodपूर