शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उजनी धरणातील उघडी पुरातन मंदिरे पुन्हा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:53 IST

उजनी भरले ९३ टक्के; ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप 

ठळक मुद्देपुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होतीपोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होतेपावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली

 करमाळा : तब्बल चार महिने मृत साठ्यात असलेले उजनी धरण गत सप्ताहात उपयुक्त पाणीसाठ्यात आल्याने पाण्याबाहेर उघडे पडलेले पुरातन पळसदेवाचे मंदिर, इनामदाराचा वाडा, ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप झाले आहेत.

गतवर्षी उजनी धरण ११० टक्के भरले, पण सर्वदूर कमी पर्जन्यमान झाल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वारंवार सोडण्यात आल्याने यंदा उजनी धरणातील पाणीपातळी वजा ५९ पर्यंत जाऊन पोहोचली होती. उजनी धरण निर्मितीवेळी तालुक्यातील वांगी, चिखलठाण, कुगाव, कंदर, पारेवाडी, सांगवी, ढोकरी, टाकळी, कोंढारचिंचोली, सोगाव, कात्रज, खातगाव या गावांचे पुनर्वसन झाले. दरम्यान, उठलेल्या गावातील पुरातन अवशेष त्यावेळी पाण्यात गडप झाले.

उजनी धरणातील पाणी यंदा एप्रिलमध्ये मृतपातळीमध्ये गेले. यामुळे पाण्यात लपलेली पुरातन अवशेष बाहेर डोकावू लागली. त्यामध्ये कुगावच्या जुन्या गावठाणातील इनामदारांच्या वाड्याचा समावेश होता. या इनामदारांच्या वाड्यात तरुणाईला वेड लावणाºया नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होते. 

पुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होती. गेल्या महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात व त्यानंतर तीन दिवसांत पुणे परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने पुणे भागातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येऊन धरण मायनसमधून प्लसमध्ये आले. गेल्या चार दिवसांत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली आहेत.

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा झाल्याने व धरणात श्ांभर टक्के पाणीसाठा होणार असल्याने पुनर्वसित शेतकºयांतून आनंद व्यक्त होत असून, धरण व नदीपात्रात पाणी वाढल्याने पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेऊ लागले आहेत. प्रा. शिवाजीराव बंडगर,अध्यक्ष, उजनी धरण पुनर्वसन संघर्ष समिती

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकfloodपूर