शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उजनी धरणातील उघडी पुरातन मंदिरे पुन्हा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:53 IST

उजनी भरले ९३ टक्के; ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप 

ठळक मुद्देपुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होतीपोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होतेपावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली

 करमाळा : तब्बल चार महिने मृत साठ्यात असलेले उजनी धरण गत सप्ताहात उपयुक्त पाणीसाठ्यात आल्याने पाण्याबाहेर उघडे पडलेले पुरातन पळसदेवाचे मंदिर, इनामदाराचा वाडा, ब्रिटिशकालीन पाचपूल पुन्हा पाण्याखाली गडप झाले आहेत.

गतवर्षी उजनी धरण ११० टक्के भरले, पण सर्वदूर कमी पर्जन्यमान झाल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वारंवार सोडण्यात आल्याने यंदा उजनी धरणातील पाणीपातळी वजा ५९ पर्यंत जाऊन पोहोचली होती. उजनी धरण निर्मितीवेळी तालुक्यातील वांगी, चिखलठाण, कुगाव, कंदर, पारेवाडी, सांगवी, ढोकरी, टाकळी, कोंढारचिंचोली, सोगाव, कात्रज, खातगाव या गावांचे पुनर्वसन झाले. दरम्यान, उठलेल्या गावातील पुरातन अवशेष त्यावेळी पाण्यात गडप झाले.

उजनी धरणातील पाणी यंदा एप्रिलमध्ये मृतपातळीमध्ये गेले. यामुळे पाण्यात लपलेली पुरातन अवशेष बाहेर डोकावू लागली. त्यामध्ये कुगावच्या जुन्या गावठाणातील इनामदारांच्या वाड्याचा समावेश होता. या इनामदारांच्या वाड्यात तरुणाईला वेड लावणाºया नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पोमलवाडी-केत्तूर परिसरात असलेला ब्रिटिशकालीन पाचपूल, पळसदेव येथील पळसनाथाचे मंदिर, वांगी येथील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा, नागनाथ या मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर पडले होते. 

पुरातन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांनी उजनी धरण परिसरात गर्दी केली होती. गेल्या महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात व त्यानंतर तीन दिवसांत पुणे परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने पुणे भागातील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येऊन धरण मायनसमधून प्लसमध्ये आले. गेल्या चार दिवसांत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे उपयुक्त साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याबाहेर पडलेली सर्व पुरातन अवशेष पुन्हा पाण्याखाली बुडाली आहेत.

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा झाल्याने व धरणात श्ांभर टक्के पाणीसाठा होणार असल्याने पुनर्वसित शेतकºयांतून आनंद व्यक्त होत असून, धरण व नदीपात्रात पाणी वाढल्याने पर्यटक नौकाविहाराचा आनंद घेऊ लागले आहेत. प्रा. शिवाजीराव बंडगर,अध्यक्ष, उजनी धरण पुनर्वसन संघर्ष समिती

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकfloodपूर