शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

खुली चर्चा : मुलींना मोबाइल बंदी समर्थनीय आहे का? जाणा वाचकांची मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 08:24 IST

गुजरातमधील एका समाजाच्या पंचायतीने समाजातील अविवाहित तरुणींच्या मोबाईल वापराला बंदी आणण्याचा विचार चालविला आहे. याबाबत 'लोकमत'ने आपल्या वाचकांची मते जाणून घेतली. यामध्ये वाचकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत.

गुजरातमधील एका समाजाच्या पंचायतीने समाजातील अविवाहित तरुणींच्या मोबाईल वापराला बंदी आणण्याचा विचार चालविला आहे. तिच्याजवळ मोबाईल आढळल्य़ास वडिलांकडून तब्बल दीड लाखांचा दंड उकळला जाणार आहे. तसेच कुटुंबियांच्या परवानगीशिवाय लग्न करण्यावरही बंधने लादण्यात आली आहेत. याबाबत 'लोकमत'ने आपल्या वाचकांची मते जाणून घेतली. यामध्ये वाचकांनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

अभ्य़ासासाठी मोबाईल फायद्याचामोबाईल हा काळाची गरज आहे. मला वाटते मोबाईल जर चांगल्या कामांसाठी वापरलं गेला तर त्यात चुकीचे काही नाही. कारण शिक्षण घेत असणार्‍या मुली अभ्यासाची सविस्तर माहिती मोबाईलवर पाहत असतात. माझ्या मते प्रत्येक आई वडिलांनी मुलींचा मोबाईल वेळोवेळी तपासायला हवा.त्यामुळे मुली वाईट मार्गावर जाणार नाहीत. अविवाहित मुलींना मोबाईल बंदी हे चुकीचे आहे.

- गायत्री पाटील. (महाविद्यालयीन विद्यार्थिनी)

मुलांवरही बंदी हवीफक्त मुलींनाच मोबाईल वापरावर बंदी नको तर महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या सर्वच मुलांवरही बंदी असावी. शालेय जीवनात मोबाईलची गरज नाही. मोबाईलचा वापर अभ्यासासाठी होत नसून वेळ वाया घालवण्यासाठीच केला जातो. अतिवापरामुळे मुलं घडत नाहीत तर ती बिघडत चालली आहेत. पालकांनी-दहा हजार मोबाईलवर खर्च करण्यापेक्षा   त्याच्या शिक्षणावर खर्च करावेत.

- गिरी राजगुरु प्रल्हाद.(प्रा.शिक्षक)

समाज युवा वर्गाची प्रगती रोखतोय युवा वर्गाला अभ्यासक्रमातील विविध बाबी समजून घेण्यासाठी मोबाईल तंत्रज्ञान सहाय्यक ठरते. कोणत्याही क्षेत्रात मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, शिक्षकी पेशा असो किंवा कोणतेही क्षेत्र तुम्ही निवडले असेल तरी या सर्व क्षेत्रात कार्य करण्यासाठीच प्रगल्भ ज्ञान मिळवण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञान सहाय्यक ठरते. जर एखादा समाज जाणीवपूर्वक या तंत्रज्ञानापासून युवा वर्गाला दूर ठेवत असेल तर तो समाज युवा वर्गाची प्रगती आजच रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अविवाहित मुली व महिलांना मोबाईल वापर बंदी करणे योग्य नाही.

- शरदचंद्र हिंगे 

मुलांकडूनच मोबाईलचा गैरवापर अधिकमोबाईल हे घडामोडी जाणून घेण्याचे, बाहेरच्या जगाशी संपर्काचे महत्त्वाचे साधन तर आहेच, पण सुरक्षिततेच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा आहे. मुलींकडे मोबाइल नकोच, अशी बंधने मुले वा पुरुषांवर का लादत नाहीत? खरे तर मोबाइलचा गैरवापर पुरुष, मुलेच अधिक करताना दिसतात. म्हणून पुरुषांना मोबाइल कशाला हवाय वा त्यांच्या मोबाइल वापरण्यावर बंदी आणावी, असे महिला म्हणत नाहीत. नारीशक्तीचा जागर सुरू असतानाच अब्रू, इज्जत यांच्या नावाखाली मुली-महिलांवरच कठोर बंधने टाकण्याचे तालिबानी प्रयत्नही राजरोस सुरू आहेत.१८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला घटनेने जे स्वातंत्र्य दिले आहे, त्याच्याआड येणे चुकीचे आहे.

- योगेश प्रल्हाद जिरेकर

मग मुलांना अभ्यासाची गरज नाहीय का?जात, धर्म व लिंग असा भेद करून एखाद्या घटकावर काहीही बंदी घालणे चुकीचे आहे व तसेच ते असंविधानिक कृत्य आहे. मोबाईल वापराची बंदी मुलींनाच का करावी? मोबाईलच्या वापरावर बंदी घातली तर मुलींचा अभ्यास चांगला होईल याचा अर्थ मुलांना अभ्यासाची गरज नाही का? तंत्रज्ञानाच्या युगात त्याचा वापर न करणे म्हणजे काळाच्या मागे राहणे असेच आहे. प्रत्येकाने काळासोबत चालायला हवं. स्त्री आणि पुरुष असे दोघेही मिळून संसार चालतो त्यामुळे कमी अधिक पणाची भावना एकमेकांबद्दल असू नये.

- डॉ. धर्माजी खरात 

टॅग्स :Mobileमोबाइल