शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

केवळ महिलांच्या सन्मानासाठी...

By admin | Updated: November 20, 2014 01:04 IST

महिला कुठेही कमी नाही, फक्त त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची गरज आहे. मात्र आजही अनेक महिला आत्मविश्वासाअभावी आपल्या कलागुणांना समोर आणू शकत नाही.

सुनीताने गाठला १४०० कि.मी.चा पल्ला : एशिया बुकमध्ये विक्रमाची नोंदनागपूर : महिला कुठेही कमी नाही, फक्त त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची गरज आहे. मात्र आजही अनेक महिला आत्मविश्वासाअभावी आपल्या कलागुणांना समोर आणू शकत नाही. अशा महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्या स्वावलंबी बनाव्या आणि समाजात महिलांचा सन्मान वाढावा, या उद्देशाने नागपुरातील प्राध्यापिकेने १४१२ किमी.ची सायकल वारी करून, समाजातील महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. नागपूर ते पाँडेचेरी हे अंतर तीने अवघ्या ७ दिवसात पूर्ण केल्याने, तीच्या कर्तृत्वाची नोंद एशिया बुक आॅफ रेकॉर्डने केली आहे. ४२ वर्षीय सुनीता क्षीरसागर धोटे या खेळाडू वृत्तीच्या आहे. मात्र घरातून खेळाला विशेष प्रोत्साहन न मिळाल्याने त्यांना क्रीडा क्षेत्राला शैक्षणिक वयातच सोडावे लागले. शिक्षण झाल्यानंतर परत क्रीडा क्षेत्रात सहभागी व्हावे, अशी इच्छा असताना, त्यांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर संसारात रमल्यावर खेळापासून त्या पूर्णत: दूर झाल्या. मात्र शारीरिक आणि मानसिक बळकटीसाठी व्यायाम, सायकलिंग करणे सातत्याने सुरू ठेवले. रामदेवबाबा कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. दोन मुले, पती असे त्यांचे कुटुंब आहे. कुटुंब आणि व्यवसाय सांभाळून त्या आपल्या आवडीनिवडीसाठी वेळ देतात. २०११ मध्ये त्यांनी मुंबई ते गोवा ही सायकलवारी केली होती. यावेळी त्यांनी १४० किमी. दररोज सायकल चालविली होती. हा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर समाजासाठी, देशासाठी काहीतरी करावे ही भावना सतत त्यांच्या मनात होती. त्यातच स्वच्छ भारत अभियानाचा नारा पंतप्रधानांनी दिला. या अभियानात एक भारतीय म्हणून आपणही सहभागी व्हावे, या भावनेतून नागपूर ते पाँडेचेरी दरम्यान सायकलवारी करण्याचा निर्णय त्यांनी २ आॅक्टोबरला घेतला. ७ नोव्हेंबरपासून त्यांनी अभियानाला सुरुवात केली. झिरो माईल येथून त्यांचा प्रवास सुरू झाला. सरासरी २०० ते जास्तीत जास्त २६० किमी त्या दररोज सायकल चालवायच्या. अवघ्या ७ दिवसात त्यांनी १४१२ किलोमीटरचे अंतर गाठले. यावेळी पाँडेचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करून, एशिया बुक आॅफ रिकॉर्डचे प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)चॅलेंजेस जगण्याची ऊर्जा वाढवितेमिळालेल्या संधीचे सोने करणे हा त्यांचा स्वभाव राहिला आहे. ४२ व्या वर्षात स्विमिंगमध्ये अतिशय यशस्वी डायव्हिंग करून त्यांनी गोल्ड मेडल मिळविले आहे. साधारणत: ४० नंतर महिलांच्या जीवनशैलीत बदल होतो. या वयानंतर त्यांच्यावर दडपणही वाढते. हे दडपण कमी करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येक स्त्रीने खेळ, व्यायाम यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवीन चॅलेंजेस स्वीकारल्यानंतर जगण्याची ऊर्जा वाढते, जीवन सुंदर होते. डॉ. सुनीता क्षीरसागर धोटे, सायकलपटू