...तरच राज्याचा विकास
By Admin | Updated: July 2, 2016 04:17 IST2016-07-02T04:17:46+5:302016-07-02T04:17:46+5:30
महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे.

...तरच राज्याचा विकास
मुंबई : महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे. ही बाब ध्यानात घेऊनच माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीवर लक्ष्य केंद्रीत केले होते, असे मत राज्याचे मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे वसंतराव नाईक यांच्या १०३व्या जयंती दिनानिमित्त प्रतिष्ठेच्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोंगिरवार बोलत होते. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हायला हवा, यासाठी वसंतगराव नाईक आग्रही होते. दोन वर्षात तसे झाले नाही तर फाशी घेईन, अशी घोषणाच त्यांनी केली होती. जास्त वाणाचे पीक, हायब्रीड ज्वारी उत्पादनाकडे वसंतरावांनी विशेष लक्ष्य दिले. केवळ संशोधनाच्या माध्यमातूनच प्रगतीशील शेती शक्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळ त्यांनी चार कृषी विद्यापीठांची स्थापना केल्याचे बोंगीरवार म्हणाले. (प्रतिनिधी)
>यंदाचे विविध विभागांतील वसंतराव नाईक कृषी पुरस्कार विजेते
सामाईक पुरस्कार (उगम फाउंडेशन, कार्यवाह - भाई संपतराव पवार, जि. सांगली); कृषी पुरस्कार
( डॉ. एम.एस. लादानिया. संचालक, केंद्रीय लिबूंवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर); कृषी प्रक्रीया पुरस्कार (गौण वनऊपज व्यवस्थापन समिती, संचालक उल्हास कुमरे/ विजय मडवी. जि. नांदेड ); कृषी पत्रकारीता पुरस्कार
(संतोष काशिनाथ डुकरे, सल्लागार संपादक, कृषीकिंग मासिक आणि अॅप, जि. पुणे); कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार (विलास हरिभाऊ धुर्जड, जि. नाशिक); फलोत्पादन (उन्मेष लांडे, जि.वाशिम); भाजीपाला उत्पादन (दत्तु ढगे जि. नाशिक) ; फुलशेती उत्पादन पुरस्कार (वृंदावन पुष्पोत्पादन संघ, अध्यक्ष- सुरेश नवसू, जि. पालघर); वनशेती पुरस्कार (परशुराम तानू आगीवाले, जि. रायगड); पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्कार (इसाक चाऊस, जि. सांगली); जलसंधारण पुरस्कार (लालासाहेब बापूसाहेब देशमुख, जि. लातूर); पर्यावरण संरक्षण पुरस्कार (अल्पाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन, डॉ. अचर्ना गोडबोले, पुणे)