शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केवळ कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीसच मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 06:09 IST

नुकसानीची भीती : बांगलादेश, नेपाळ सीमेवर उभ्या असलेल्या ट्रकमधील कांद्यांचे काय?

योगेश बिडवर्ई ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रसरकारने १४ सप्टेंबरपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी ज्या निर्यातदारांनी बंदीच्या दिवसापर्यंत त्यांचे कांद्याचे साठे बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केले होते, त्यांना ही बंदी लागू होणार नाही, असे विदेश व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे. मात्र बंदरांवर कंटेनरमध्ये भरून तयार असलेला व बांगलादेश आणि नेपाळ सीमेवर उभे असलेले ट्रक यांच्यातील तब्बल ३५ हजार टन म्हणजे १00 कोटींच्या कांदा निर्यातीचे काय, असा प्रश्न निर्यातदारांनी विचारला आहे.

नेपाळ, बांगलादेश सीमेवर कस्टम्सकडे सोपविलेल्या कांद्याच्या निर्यातीचा मार्गही मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र तेथेही कस्टम्सकडे न सोपविलेला कोट्यवधींचा कांदा आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरावर तब्बल ३५0 कांद्याचे कंटेनर उभे आहेत. त्यातील बराचसा माल कस्टम्सकडे सोपविलेला नाही. त्याचे काय करायचे, असा प्रश्न आहे. कांदा नाशिवंत आहे. कांद्याला कोंब फु टण्याची भीती आहे. तो माल निर्यात न झाल्यास कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. त्याचा फटका बसून शेवटी देशातील भावही पडतील, असे नाशिक जिल्हा कांदा निर्यातदार संघटनेने सांगितले.निर्यातबंदीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी केंद्रीयसीमाशुल्क मंडळाने (सेंट्रल कस्टम्स बोर्ड) यासंबंधी खुलासा करण्याची विनंती केली होती.

आपला निर्यातीचा माल बंदरांमध्ये आणून तपासणीसाठी कस्टम्स विभागाकडे सुपूर्द केला आहे, त्यांना लागू होणार नाही. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणारी अधिसूचना ज्या तारखेला प्रसिद्ध झाली तोपर्र्यंत वरीलप्रमाणे बंदरांमध्ये आणून कस्टम्सकडे सुपूर्द केलेला कांदा हा ‘निर्यातीच्या प्रक्रियेत असलेला माल’ ठरत असल्याने अशा कांद्याला ही निर्यातबंदी लागू होणार नाही.

निर्यातदारांपुढे अनिश्चिततामुंबई बंदरावर ३५० कंटेनर सोमवारपासून थांबले आहेत. दक्षिणेत बंदरांवर १०० कंटेनर, सीमेवर सुमारे २०० ट्रक कांदा निर्यातबंदीमुळे अडकला होता. हा सुमारे ३५ हजार टन म्हणजे १०० कोटींचा कांदा आहे. तो सर्व निर्यात होतो का, हे पाहावे लागेल.- अजित शाह, अध्यक्ष, अखिल भारतीय कांदा निर्यातदार संघटना

टॅग्स :onionकांदा