शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

देशात 'डावे' फक्त नावाला, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 15:01 IST

देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला

मुंबई : देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना फडणवीसांनी डाव्या संघटनांना आणि कॉंग्रेसला चिमटे काढले.  मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस बोलत होते. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना त्यांनी देशातून डावे हद्दपार झाले आहेत. ते केवळ नावालाच उरले आहेत. आता पूर्वेकडील राज्यातही लाल सूर्य मावळला असल्याची टीका त्यांनी केली. तसंच, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत असा टोला फडणवीसांनी लगावला. 'आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे, त्यांनी भाजपवर विश्वास दाखविल्यानेच आम्ही ही मजल मारू शकलो' असं फडणवीस म्हणाले. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शहा यांचं संघटन कौशल्य यामुळेच हा विजय संपादन झाल्याचं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. यावेळी बोलताना फडणवीसांनी, हा विजय केवळ ट्रेलर आहे,  पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. कर्नाटकात आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच बहुमताने सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. पूर्वेकडील राज्यात भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या सुनील देवधर यांचंही फडणवीस यांनी कौतुक केलं. देवधर यांनी दोन वर्ष त्रिपुरात संघर्ष केला. त्याचंच हे फळ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो- मुख्यमंत्री आज पार पडलेल्या नदी संवर्धन संकल्प कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेले नाहीत.  त्यावर प्रतिक्रिया देताना, मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. आरोप करणारे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, अशांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. 

  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस