शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

देशात 'डावे' फक्त नावाला, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुका लढवाव्यात : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 15:01 IST

देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला

मुंबई : देशात 'डावे' फक्त नावाला उरले असून काँग्रेसने केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा खरमरीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना फडणवीसांनी डाव्या संघटनांना आणि कॉंग्रेसला चिमटे काढले.  मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस बोलत होते. त्रिपुरा, नागालँड विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना त्यांनी देशातून डावे हद्दपार झाले आहेत. ते केवळ नावालाच उरले आहेत. आता पूर्वेकडील राज्यातही लाल सूर्य मावळला असल्याची टीका त्यांनी केली. तसंच, काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत असा टोला फडणवीसांनी लगावला. 'आम्ही गमतीने म्हणायचो, की पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? मात्र या तिन्ही राज्यात भाजपला 49 ते 50 टक्के मतदान असल्याने अभूतपूर्व विजय मिळाला. या राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवला आहे, त्यांनी भाजपवर विश्वास दाखविल्यानेच आम्ही ही मजल मारू शकलो' असं फडणवीस म्हणाले. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शहा यांचं संघटन कौशल्य यामुळेच हा विजय संपादन झाल्याचं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. यावेळी बोलताना फडणवीसांनी, हा विजय केवळ ट्रेलर आहे,  पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर मोदींवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे. कर्नाटकात आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाच बहुमताने सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. पूर्वेकडील राज्यात भाजपच्या विजयाचे शिल्पकार असलेल्या सुनील देवधर यांचंही फडणवीस यांनी कौतुक केलं. देवधर यांनी दोन वर्ष त्रिपुरात संघर्ष केला. त्याचंच हे फळ असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो- मुख्यमंत्री आज पार पडलेल्या नदी संवर्धन संकल्प कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेले नाहीत.  त्यावर प्रतिक्रिया देताना, मी त्या कार्यक्रमाला जाणारच नव्हतो. आरोप करणारे लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, अशांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. 

  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस