शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Ganeshotsav Guidelines 2021: लाडक्या बाप्पाचं केवळ ऑनलाईन दर्शन घेता येणार; गणेशोत्सवाची नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:16 IST

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवावर निर्बंध आले आहेत.

ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिवीरे (उदा रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावेया वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावेश्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.

मुंबई – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी केरळमध्ये वाढणाऱ्या रुग्णसंख्येने अनेकांची चिंता वाढली आहे. राज्यातही ५ जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्ण आढळल्याने खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सरकारकडून वारंवार गर्दी टाळण्याचं, कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता राज्यात गणेशोत्सवामुळे सरकारनं विशेष खबरदारी घेतली आहे.

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवावर निर्बंध आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोविड १९(Covid 19) उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Maharashtra Government and BMC Issues New Guidelines For Ganeshotsav 2021)

काय आहे नियमावली?

  1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
  2. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका किंवा संबंधित प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असून घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
  3. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.
  4. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे, मुर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
  5. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिवीरे (उदा रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती करण्यात यावी.
  7. लागू करण्यात आलेले निर्बंध वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कुठलीही शिथिलता देता येणार नाही.
  8. आरती, भजन, किर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणांसंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे
  9. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जनाचा मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

मुंबई महापालिकेचे निर्बंध

  1. गणपती आगमनावेळी केवळ १० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. घरगुती गणपती आणताना केवळ ५ जणांना परवानगी देण्यात आली आहे. गणेश मंडपात बाप्पाचं दर्शन घेण्यापासून लोकांना बंदी घातली आहे.
  2. मंडळाने गणपतीचं ऑनलाईन दर्शन उपलब्ध करून द्यावं असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. गर्दी टाळणं आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्याचं आवाहन महापालिकेने केले आहे. प्रसिद्ध मंडळांनाच समुद्रात गणपती विसर्जन करण्याची परवानगी आहे. विसर्जनावेळी केवळ १० लोकांना उपस्थित राहता येईल.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सव