शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

"कधी नव्हे ते दोन रुपये मिळणार होते, पण..."; केंद्र सरकारवर कांदा परिषदेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 18:27 IST

तामिळनाडू व आंध्रप्रदेशातील कांद्याच्या निर्यातीस केंद्राने परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याच्या निर्यातीला परवानगी नाकारून राजकारणातील उट्टे काढण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱयांचा गळा कापला जात आहे.

ठळक मुद्देकांदा प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी, नोंदणी सुलभ करावी.देशभरातील शेतकरी दिल्लीला धडक देणार असल्याची घोषणा.शेतीला सिंचनाची गरज असते व विज वितरण कंपनी शेतीसाठी रात्रीची वीजपुरवठा करत आहे.

चांदवड : शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या कांदा परिषदेत कांदा प्रश्नावर चर्चा करण्यात आली. कांद्या सहीत सर्व शेतीमालातील हस्तक्षेप बंद करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे या मागणीसाठी देशभरातील शेतकरीदिल्लीला धडक देणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली.

कांद्याच्या तुडवड्यामुळे कांद्याचे भाव वाढले होते. अनेक वर्षांनंतर शेतकर्यांना दोन पैसे मिळणार होते. पण केंद्र शासनाने कांद्यावर घातलेल्या निर्बंधांमुळे व निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरले. आता कांद्याची आवक वाढलेली आहे व दर कोसळत असताना सुद्धा कांद्यावरील निर्बंध हटविण्यास केंद्र शासन तयार नाही. या बाबत कांदा परिषदेतील वक्त्यांनी सडकून टीका केली.  

 तामिळनाडू व आंध्रप्रदेशातील कांद्याच्या निर्यातीस केंद्राने परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याच्या निर्यातीला परवानगी नाकारून राजकारणातील उट्टे काढण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱयांचा गळा कापला जात आहे. सरकार जर शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास तयार नसेल तर राज्याप्रमाणे देशातील शेतकरी विरोधी सरकार सुद्धा घरी पाठवण्याची तयारी शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन घनवट यांनी केले.

 

कांदा प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी, नोंदणी सुलभ करावी. पुरेसा पत पुरवठा करण्यात यावा तसेच देशातील व राज्यातील कांदा लागवड व उत्पादनाची माहिती शेतकरी, व्यापारी, निर्यातदार व उद्योजकांना दर पंधरवाड्याला देण्यात यावी या बाबींचा कांदा परिषदेतील ठरावात समावेश केला आहे. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ही या परिषदेत करण्यात आली.  या परिषदेत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, कांदा उत्पादक संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव, प. महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे, शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष सतीष दाणी या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.

कांदा परिषदेमध्ये खालील ठराव करण्यात आले...

  • ठराव क्र.१- ठराव करण्यात येतो की भारत सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या हिता आड येणारे धोरण न ठरवता त्यंच्या हिताचे धोरण अवलंबावे.
  • ठराव क्र २- कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवरील मर्यादा, वाहतुकी वरील मर्यादा, परदेशातुन महाग कांद्याची आयात अशी उपाय योजना करु नये.
  • ठराव क्र ३ - कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायम स्वरुपी बंद करावा.
  • ठराव क्र  ४ -  कांद्यावर प्रक्रिया करणार्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी जमिन बिनशेती करण्याची शर्त न ठेवता, नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.
  • ठराव क्र ५ - कांद्यावर प्रक्रिया करण्या उद्योजकांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना, शेतकरी गटांना वित्त संस्थांकडुन पुरेसे भांडवल पुरवण्यात यावे. या कामी उद्योजकाच्या किंवा उत्पादक कंपनीच्या सभासदांच्या शेती कर्जाचा अडसर येऊ नये.
  • ठराव क्र ६ - शेतीला सिंचनाची गरज असते व विज वितरण कांपनी शेतीसाठी रात्रीची वीजपुरवठा करत आहे. सध्या ग्रामिण भागात झालेला वन्य प्राण्यांचा सुळसुळाट, विजेचा लपंडाव व शेतकर्यांची शारिरीक व मानसिक पिळवणुक पाहता कांद्या पिका सहीत सर्व शेतीसाठी दिवसा विज पुरवठा करण्यात यावा.
  • ठराव क्र. ६- राज्यातील व देशातील कांदा लागवड व उत्पादनाची अचुक माहिती शेतकरी, व्यापारी, निर्यातदार व प्रशासनाला वेळेवर उपलब्ध होत रहावी यासाठी सरकारने दर पंधरवाड्याला कांदा लागवडीची व अपेक्षित उत्पादनाची माहीती उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी पार पाडावी
  • ठराव क्र ७ - शेतीला सिंचनाची गरज असते व विज वितरण कांपनी शेतीसाठी रात्रीची वीजपुरवठा करत आहे. सध्या ग्रामिण भागात झालेला वन्य प्राण्यांचा सुळसुळाट, विजेचा लपंडाव व शेतकर्यांची शारिरीक व मानसिक पिळवणुक पाहता कांदा पिका सहीत सर्व शेतीसाठी दिवसा विज पुरवठा करण्यात यावा.
टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली