४ ऑगस्ट ला कांदा आंदोलन, वेळ प्रसंगी पुन्हा रेल रोको
By Admin | Updated: July 10, 2014 23:15 IST2014-07-10T23:15:21+5:302014-07-10T23:15:21+5:30
शरद जोशी यांचा इशारा

४ ऑगस्ट ला कांदा आंदोलन, वेळ प्रसंगी पुन्हा रेल रोको
शेगाव: केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थ संकल्प शेतकर्यांसाठी अत्यंत निराशाजनक असुन कांदा उत्पादकांना न्याय मिळुवुन देण्यासाठी येत्या ४ ऑगस्ट रोजी आपण मोठय़ा प्रमाणात आंदोलन करणार आहो अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी दिली.
येत्या विधासभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधनी आणि राज्यातील राजकीय घडामोडींनवर चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटना आणि स्वंतत्र भारत पक्षांच्या राज्यस्तरीय पदाधिकार्यांची दोन दिवसीय बैठक शेगाव येथील कुणबी समाज भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या समारोपानंतर आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,या देशाला आंदोलनांची भाषा समजते शेतकर्याची नेहमींच मरण केल्या जाते. या साठी मी ४ ऑगस्ट रोजी नाशिक भागातील शेकर्यांची भेट घेणार आहे.आणि तेथेंच कांदा आंदोलन जाहिर करेल असे ते म्हणाले. आपण कुठले आंदोलन करणार असे विचारले असता वेळ प्रसंगी रेल रोको करण्याची पाळी आली ते ही मोठय़ा प्रमाणात करेल असे त्यांनी सांगीतले. राज्यभरात विधानसभे साठी आपण उम्मेदवार उभे करणार का ? असे विचारले असता राज्यातील शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाची बलस्थाने असलेल्या ठिकाणी आपण निवडणुक लढविणार आहो असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषेदेला माजी आमदार वामनराव चटप, रमेश देवांग, अँड.दिनेश शर्मा, गुणवंत पाटील,शैलेजा देशपांडे, संजय कोल्हे आदिंची यावेळी उपस्थिती होती.