शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फळ, भाजीपाला उत्पादकांसाठी हजार कोटींची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 06:03 IST

राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डाळींब, केळी, सीताफळ, पेरु, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी ही फळपिके आणि मिरची व भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि निर्यातीसाठी अर्थसाहाय्य करणाºया एक हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.त्यासाठी शेतकरी उत्पादकांच्या कंपन्या स्थापन करून त्यांना पॅकेजिंग, प्रोसेसिंग, वाहतूक आदींसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. केवळ या आठ पिकांचे काढणीनंतर योग्य व्यवस्थापन न केल्याने वर्षाकाठी ५ हजार कोटी रुपयांचे राज्यात नुकसान होते, असा अहवाल आहे. या पार्श्वभूमीवर, सदर पिकांच्या विक्रीसाठीची मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी ही योजना आणली गेली आहे. त्यासाठी ७० टक्के म्हणजे ७०० कोटी रुपयांचा निधी एशियन डेव्हलपमेंट बँक देणार असून ३०० कोटींचा भार राज्य शासन उचलेल.सहा वर्षांसाठी ही योजना राबविली जाईल.शासकीय कंत्राटदारांसाठी सवलती देण्याचा निर्णयकोरोनाच्या काळात अडचणीत आलेल्या शासकीय कंत्राटदारांना काही सवलती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार शासकीय बांधकामाच्या पूर्णत्वासाठी मुदतवाढीची विनंती कंत्राटदाराने केल्यास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. या शिवाय, कंत्राटदारांची सुरक्षा अनामत, बँक अनामत या बाबतही सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी योजनाकृषी मालावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि विशाल उद्योगांमध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासंबंधीच्या योजनेस मंत्रिमंळाने मान्यता दिली सोयाबिन, प्रक्रिया, विविध तेल बिया उत्पादनातून तेल निर्मिती, बिस्किट, चॉकलेट, संत्रा, मोसंबी, केळी, डाळिंब, द्राक्ष, काजू, आंबा, पेरू, बीट इत्यादी फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना त्याचा लाभ मिळेल. विशेषत: मागासलेल्या जिल्ह्यांपैकी विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हे तसेच नंदुरबार, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील उद्योगांना प्रोत्साहनांचा लाभ मिळेल. त्यासाठीच्या सवलतींचा कालावधी सात वर्षांहून दहा वर्षे करण्यात आला आहे. राज्य व वस्तू सेवा करातील सवलतींचा त्यात समावेश असेल.

विधिमंडळ अधिवेशन ७ सप्टेंबरपासून होणारविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून सुरू बोलविण्याची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केली. आधी हे अधिवेशन ३ आॅगस्टपासून सुरू होणार होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लवकरच बैठकगेल्या तीन ते चार महिन्यांत एसटी कर्मचाºयांच्या पगारात अडचणी येत असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चेदरम्यान सांगितले. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन यावर मार्ग काढणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी