शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लोकलमधील गर्दीचा अजून एक बळी! डोंबिवलीत लोकलमधून पडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 18:09 IST

मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अजून एका प्रवाशाचा बळी गेला आहे.

 डोंबिवली - मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील प्रचंड गर्दीमुळे अजून एका प्रवाशाचा बळी गेला आहे. गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये प्रवेश न मिळाल्याने दरवाजाला लटकून प्रवास करणा-या रविकांत भगवान चाळकर (४५) यांचा आज सकाळी धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. रविकांत चाकळर हे पलावासीटी, काटई, डोंबिवली (पूर्व) येथील रहिवासी होते.

रविकांत चाळकर हे आज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल पकडण्यासाठी डोंबिवली स्थानकात आले होते.  लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्यांना चढता आले नाही. त्यामुळे ते ते दरवाजाला लटकून प्रवास करत होते. यादरम्यान, त्यांचा तोल गेला आणि ते डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून खाली पडले. हा अपघात सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास घडली.  यासंदर्भात अधिक माहित देताना  डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले की, ''अपघात झाल्यानंतर सहप्रवाशांनी तातडीने चेनखेतरत लोकल थांबवली, त्यानूसार लोहमार्ग पोलिसांनी आणि त्या इसमाच्या मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डोक्याला प्रचंड मार लागल्याने रक्तस्त्राव झाला होता. तेथे उपचार करण्यासाठी नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.''पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मयत इसम हे मुंबई न्यायालयात क्लार्क पदावर कार्यरत होते. या अपघातासंदर्भात मयताच्या मित्रांनीच त्यांच्या घरी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार मयातची आई, पत्नी, मुलगी असा परिवार घटनास्थळी आला होता. मयताची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांकडे मृतदेह सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले. गर्दीचा बळी गेल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त झाली. त्यावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असून, डोंबिवली स्थानकातून लोकल सोडणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलdombivaliडोंबिवलीAccidentअपघात