शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:48 IST

मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार असे जरांगे यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, 288 मतदार संघात तयारी करा, असेही जरांगे यांनी म्हटले होते. मात्र आता...

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व पक्ष आपापली गणितं, समीकरणं जुळवताना दिसत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथून विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मोठी घोषणा केली होती. मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार असे जरांगे यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, 288 मतदार संघात तयारी करा, असेही जरांगे यांनी म्हटले होते. मात्र आता, "एका जातीच्या बळावर या राज्यात कुणीच निवडणुका जिंकू शकत नाही," असे मोठे विधान जरांगे यांनी केले आहे. तसेच, सर्वांना सोबत घेऊन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते अंतरवली सराटी येथे माध्यमांसोबत बोलत होते.

काय म्हणाले जरांगे...? -जरांगे  म्हणाले, "मराठा समाजाच्या चळवळीत  प्रत्येकाचे योगदान आहे. त्यामुले मी प्रयत्न करणार आहे. मात्र मी माझे मत त्यांच्यावर लादनार नाही. समजावून सांगेन. कुणाला तरी एकाला उबे रहावे लागणार आहे. मात्र त्यांनी नाहीच एकले, तर मी त्यांच्यावर नाराजही होणार नाही आणि रुसणारही नाही. मात्र एक जबाबदारी म्हणून मी आज सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. आता जिल्हानिहाय बैठकीला सुरुवात करत आहे. आता आम्ही जागलो तर पुढील पाच वर्ष गरिबांना न्याय मिळणार आहे. आपल्या समाजाचे मोठे योगदान आहे. आपला समाज पाठीशी उभा राहिला आहे. त्यंना जर आनंदी ठेवायचे असेल, सुखी ठेवायचे असेल तर, हे आता हे 30-40 जिवस आपण कष्ट केले, तर पुढेच पाच वर्ष गोर गरीब जनता ओबीसी असो अथवा अठरा पगड जातीची असो सुखी राहणार आहे. शेतकरी आनंदी राहणार आहेत."

तुम्हीच जर उभे राहण्याचा हट्ट धरला, तर..."हे गोर गरीब जर सत्तेत गेले तर गरिबांचे प्रश्न मिटणार आहेत. श्रीमंतांचे प्रश्न मिटले काय आणि न मिटले काय त्यांना काही फरक पडत नाही. हेच मी सर्व इच्छुकांना समजावून सांगणार आहे आणि तुम्हीच जर उभे राहण्याचा हट्ट धरला, तर ना तुमचे स्वप्न पूर्ण होईन ना त्या गोर गरीब जनतेचे स्वप्न पूर्ण होईल. माझ्या गोर गरिबांचे वाटोळे होऊ नये, कारण ती गोरगरीब जनताच तुम्हाला मतदान करणार आहे. पण तुम्ही उभेच राहण्याचा हट्ट धरला, तर तुम्ही तो गोरगरिबांसाठी करत नाही, तर राजकीय स्वार्थासाठी करत आहात, असा त्याचा अर्थ होईल. तुम्हाला एक दिल्यावर सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहिले, तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला गरिबांसाठी काम करायचे आहे," असेही जरांगे म्हणाले.

चार-पाच जणांनी फऑर्म भरून ठेवायचे अन्... आज आम्ही उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न करणार आहोत, याशिवाय, किती मतदार संघ लढायचे आहे, यावरही आमची चर्चा होणार मात्र ते आता जाहीर करणार नाही. कारण आम्हाला त्यांची यादी बघायची आहे. या दोगांचीही यादी बघून आम्हीही ठवणार. त्यामुळे मतदार संघ सांगणार नाही. मात्र, चार-पाच जणांनी फऑर्म भरून ठेवायचे. वेळ प्रसंगी जे मतदारसंघ लढायचे नाही, ते फॉर्म मागे घ्याचे. 29-30 तारखेला सर्वांचे फोर्म भरायचे झाले की, की एखादवेळ मतदारसंघ आणि उमेदवार सांगू," असेही जरांगे यावेळी म्हणाले. 

एका जातीच्या बळावर या राज्यात कुणीच निवडणुका जिंकू शकत नाही -"उद्यापासून तीन दिवस मी इतरांचे समीकरण जुळवणार आहे. कारम मी पूर्वीच सांगितले आहे की, एका जातीच्या बळावर या राज्यात कुणीच निवडणुका जिंकू शकत नाही. मग तुम्ही कितीही उड्या मारा. कुणीच नाही जिंकू शकत. त्याला समीकरणंच जुळलेली हवीत. नसता उगाच अपमान करायला... तसे तर मी माागेही बरीच समीकरणे जुळवली आहेत. पण 25,26 आणि 27 तारकेला मी तेही काम करणार आहे. सर्व छोट्या छोट्या जाती, जसे मायक्रो ओबीसी, दलीत, मुस्लीम, या सर्व गोरगरिबांचे समीकरण आपण जुळवणार आहोत."

   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील