शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जुन्या पेन्शनमुळे आर्थिक बोजा वाढेल; पण त्यातून मार्ग काढू : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 07:15 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे संघटनांना संप न करण्याचे आवाहन

मुंबई :  जुनी पेन्शन योजना लागू केली तर आता त्याचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही, पण  २०३० नंतर त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागतील. राज्यावर आर्थिक बोजा वाढेल. त्यामुळे विरोधी पक्षांनी हा इगोचा विषय करू नये. कर्मचारी संघटनांनी भावनिक होऊ नये. त्यांनी तांत्रिक बाजू समजून घेण्याची गरज आहे.  संप मागे घ्यावा. चर्चेतून मार्ग काढू, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी सुरक्षित हमी देणारी जुनी पेन्शन योजना सुरू करा, त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस मेडिक्लेम सुरू करून त्यांचे हेलपाटे थांबवून दिलासा द्यावा, या मागणीसाठी विधान परिषदेत शुक्रवारी शिक्षक आमदार आक्रमक झाले. सभागृहात जुनी पेन्शनसह अनेक मुद्द्यांवर ९७ अन्वये दोन सत्रांत  सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, देशातील ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, ती राज्ये २०३० पर्यंत पैसे देतील. परंतु त्यानंतर त्यांना पैसे देणं शक्य होणार नाही. 

केंद्र सरकार फक्त योजनांसाठीच पैसे देत असते, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नाही. त्यामुळे आपण ही योजना लागू केली आणि जरी आपला महसूल वाढला तरी तो खर्चाच्या प्रमाणात वाढणार नाही. हा घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही, तो शांतपणे घेण्याचा निर्णय आहे. जे सरकार जुन्या पेन्शन योजनेकडे जाईल, ते येणाऱ्या सरकारवर बोजा टाकून जाणार आहे. संघटनांसोबत मी अधिवेशनानंतर संपूर्ण दिवस बसणार असून त्यांनी दिलेला पर्याय उत्तम असेल, तर तो आम्ही स्वीकारू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

चर्चेत विरोधी पक्षालाही सामावून घ्या! - दानवेजुन्या पेन्शनवर तोडगा काढण्यासाठी आर्थिक तज्ज्ञांसह सरकारी, शिक्षक संघटना, सरकार यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेत विरोधी पक्षालाही सामावून घ्या, अशी मागणी  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. चर्चेत मनीषा कायंदे, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित तांबे, विक्रम काळे, अभिजीत वंजारी, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला.

सोमवारी बैठक घेणारजुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्य सचिवांबरोबर बैठक झाली आहे. सोमवारी देखील बैठक घेऊ. त्यात विरोधी पक्षालाही बोलावू. मात्र, राज्यातील शिक्षक-सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र