शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनमुळे आर्थिक बोजा वाढेल; पण त्यातून मार्ग काढू : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 07:15 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे संघटनांना संप न करण्याचे आवाहन

मुंबई :  जुनी पेन्शन योजना लागू केली तर आता त्याचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही, पण  २०३० नंतर त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागतील. राज्यावर आर्थिक बोजा वाढेल. त्यामुळे विरोधी पक्षांनी हा इगोचा विषय करू नये. कर्मचारी संघटनांनी भावनिक होऊ नये. त्यांनी तांत्रिक बाजू समजून घेण्याची गरज आहे.  संप मागे घ्यावा. चर्चेतून मार्ग काढू, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी सुरक्षित हमी देणारी जुनी पेन्शन योजना सुरू करा, त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस मेडिक्लेम सुरू करून त्यांचे हेलपाटे थांबवून दिलासा द्यावा, या मागणीसाठी विधान परिषदेत शुक्रवारी शिक्षक आमदार आक्रमक झाले. सभागृहात जुनी पेन्शनसह अनेक मुद्द्यांवर ९७ अन्वये दोन सत्रांत  सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, देशातील ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, ती राज्ये २०३० पर्यंत पैसे देतील. परंतु त्यानंतर त्यांना पैसे देणं शक्य होणार नाही. 

केंद्र सरकार फक्त योजनांसाठीच पैसे देत असते, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नाही. त्यामुळे आपण ही योजना लागू केली आणि जरी आपला महसूल वाढला तरी तो खर्चाच्या प्रमाणात वाढणार नाही. हा घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही, तो शांतपणे घेण्याचा निर्णय आहे. जे सरकार जुन्या पेन्शन योजनेकडे जाईल, ते येणाऱ्या सरकारवर बोजा टाकून जाणार आहे. संघटनांसोबत मी अधिवेशनानंतर संपूर्ण दिवस बसणार असून त्यांनी दिलेला पर्याय उत्तम असेल, तर तो आम्ही स्वीकारू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

चर्चेत विरोधी पक्षालाही सामावून घ्या! - दानवेजुन्या पेन्शनवर तोडगा काढण्यासाठी आर्थिक तज्ज्ञांसह सरकारी, शिक्षक संघटना, सरकार यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेत विरोधी पक्षालाही सामावून घ्या, अशी मागणी  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. चर्चेत मनीषा कायंदे, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित तांबे, विक्रम काळे, अभिजीत वंजारी, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला.

सोमवारी बैठक घेणारजुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्य सचिवांबरोबर बैठक झाली आहे. सोमवारी देखील बैठक घेऊ. त्यात विरोधी पक्षालाही बोलावू. मात्र, राज्यातील शिक्षक-सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र