शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जुन्या पेन्शनमुळे आर्थिक बोजा वाढेल; पण त्यातून मार्ग काढू : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 07:15 IST

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे संघटनांना संप न करण्याचे आवाहन

मुंबई :  जुनी पेन्शन योजना लागू केली तर आता त्याचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही, पण  २०३० नंतर त्याचे विपरीत परिणाम दिसायला लागतील. राज्यावर आर्थिक बोजा वाढेल. त्यामुळे विरोधी पक्षांनी हा इगोचा विषय करू नये. कर्मचारी संघटनांनी भावनिक होऊ नये. त्यांनी तांत्रिक बाजू समजून घेण्याची गरज आहे.  संप मागे घ्यावा. चर्चेतून मार्ग काढू, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्यासाठी सुरक्षित हमी देणारी जुनी पेन्शन योजना सुरू करा, त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस मेडिक्लेम सुरू करून त्यांचे हेलपाटे थांबवून दिलासा द्यावा, या मागणीसाठी विधान परिषदेत शुक्रवारी शिक्षक आमदार आक्रमक झाले. सभागृहात जुनी पेन्शनसह अनेक मुद्द्यांवर ९७ अन्वये दोन सत्रांत  सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, देशातील ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, ती राज्ये २०३० पर्यंत पैसे देतील. परंतु त्यानंतर त्यांना पैसे देणं शक्य होणार नाही. 

केंद्र सरकार फक्त योजनांसाठीच पैसे देत असते, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नाही. त्यामुळे आपण ही योजना लागू केली आणि जरी आपला महसूल वाढला तरी तो खर्चाच्या प्रमाणात वाढणार नाही. हा घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही, तो शांतपणे घेण्याचा निर्णय आहे. जे सरकार जुन्या पेन्शन योजनेकडे जाईल, ते येणाऱ्या सरकारवर बोजा टाकून जाणार आहे. संघटनांसोबत मी अधिवेशनानंतर संपूर्ण दिवस बसणार असून त्यांनी दिलेला पर्याय उत्तम असेल, तर तो आम्ही स्वीकारू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

चर्चेत विरोधी पक्षालाही सामावून घ्या! - दानवेजुन्या पेन्शनवर तोडगा काढण्यासाठी आर्थिक तज्ज्ञांसह सरकारी, शिक्षक संघटना, सरकार यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेत विरोधी पक्षालाही सामावून घ्या, अशी मागणी  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. चर्चेत मनीषा कायंदे, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित तांबे, विक्रम काळे, अभिजीत वंजारी, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला.

सोमवारी बैठक घेणारजुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्य सचिवांबरोबर बैठक झाली आहे. सोमवारी देखील बैठक घेऊ. त्यात विरोधी पक्षालाही बोलावू. मात्र, राज्यातील शिक्षक-सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र