शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

किनारपट्टीवरील कार्यालये, उद्योग २ दिवस बंद -मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 6:48 AM

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई, ठाणे, रायगडसह सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीतील सर्व कार्यालये आणि उद्योग निसर्ग चक्रीवादळामुळे ...

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, ठाणे, रायगडसह सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीतील सर्व कार्यालये आणि उद्योग निसर्ग चक्रीवादळामुळे ३ आणि ४ जूनला बंद राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

या चक्रीवादळाबाबत राज्यातील जनतेशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, की ३ जूनपासून आपण पुनश्च हरिओम करणार होतो; परंतु या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी घरीच राहणे अतिशय आवश्यक आहे. कोणीही अजिबात घराबाहेर पडू नका. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. ज्याप्रमाणे कोरोनाला रोखून त्याला परतवण्याच्या आपण मागे आहोत त्याचप्रमाणे या चक्रीवादळातूनही सहीसलामत बाहेर पडू.

संकटाच्या छाताडावर चाल करून आपल्याला जायचे आहे. बुधवारी दुपारपर्यंत हे वादळ धडकणार आहे. अशा वेळी नागरिकांनी विजेचा कमीत कमी वापर करावा किंवा घरातील वीज बंद ठेवावी. वीजप्रवाह खंडित करण्याचीसुद्धा वेळ येऊ शकते. घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. हंगामी शेडमध्ये वा मोडकळीस आलेल्या जागेत आडोशाला जाऊ नये. किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा प्रशासनाला सहकार्य करा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी मैदानावर उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरे