शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, दलालांची हातमिळवणी

By admin | Updated: February 3, 2015 01:44 IST

आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेले असतानाच त्याची राज्यातील आरटीओकडून अंमलबजावणी केली जात असल्याचे अनेक आरटीओकडून सांगण्यात आले.

मुंबई : आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिलेले असतानाच त्याची राज्यातील आरटीओकडून अंमलबजावणी केली जात असल्याचे अनेक आरटीओकडून सांगण्यात आले. तरीही काही अधिकारी आणि कर्मचारी दलालांशी हातमिळवणी करून कामे करीत असल्याची माहिती परिवहन विभागाला मिळाली असून, त्यामुळे निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आला आहे.आरटीओ दलालमुक्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. अखेर १२ जानेवारी २0१५ रोजी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओ १७ जानेवारीपासून दलालमुक्त करण्याचे आदेश आरटीओंना दिले आणि १९ जानेवारीपासून आरटीओंना अचानक भेट देणार असल्याचेही सांगितले. यात दुर्लक्ष झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची ताकीदही परिवहन आयुक्तांकडून देण्यात आली. तरीही काही अधिकारी आणि कर्मचारी दलालांच्या संपर्कात असल्याचे परिवहन आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ३१ जानेवारी २0१५ रोजी एक पत्रक काढण्यात आले असून, यात सर्व आरटीओतून अनधिकृत व्यक्तींना वावर करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र काही आरटीओंबाहेरील अनधिकृत व्यक्ती आरटीओतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून कार्यालयाबाहेरून कागदपत्रे पाठवून अनधिकृतपणे नागरिकांची कामे करून देत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, कोणी अधिकारी किंवा कर्मचारी अशा प्रकारे हातमिळवणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही या पत्रकातून दिला आहे. यातूनच अजूनही आरटीओ अधिकारी आणि दलालांचा संपर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)राज्यातील आरटीओ कार्यालयांना दलालांचा विळखा बसल्याने सर्वसामान्यांना जादा पैसे आकारून अनेक कामे करावी लागत आहेत. यात आरटीओतील कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात साथ दलालांना मिळत असल्याचे निदर्शनास आल्याने २00७ आणि २0१२ रोजी आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले.