शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

संपर्क अभियानात भाजपाच्या रडारवर ओबीसीच्या ३८४ जाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 00:26 IST

ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या ३८४ जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर महाराष्ट्राने देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले.

मुंबई : ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या ३८४ जातींपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर महाराष्ट्राने देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले. या निर्णयांचा पूर्ण फायदा उचलण्यासाठी प्रदेश ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व ३८४ जातींपर्यंत पोहोचण्याची तयारी भाजपाने चालवली आहे.भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे सध्या राज्यभर संवाद से संपर्क अभियान सुरू आहे. या अंतर्गत मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की, काँग्रेसने ४० वर्षे ओबीसी समाजावर अन्याय केला. समाजाला घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ४० वर्षांपासून खितपत पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिले ओबीसी मंत्रालय स्थापन केले. या निर्णयाचा ओबीसी समाजाला मोठा फायदा होणार आहे. ओबीसींचे वाढते संघटन भाजपासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे राज्यातील ३८४ जातींपैकी आपल्या शहरात असलेल्या जातींचे नेते, जातसमूहांच्या संघटना आणि त्यांच्या पदाधिकाºयांपर्यंत पोहोचायला हवे. भाजपा सरकारने ओबीसी समाजासाठी केलेले काम त्यांच्यापर्यंत पोहोचवतानाच या जातींच्या समस्या आणि मागण्याही जाणून घ्याव्यात. भविष्यात या मागण्यांबाबत सरकार पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे विजय चौधरी म्हणाले.ओबीसी प्रवर्गात मोडणाºया प्रवर्गातील जातींचे संघटन भाजपाच्या हिताचे असले तरी या वर्गाला भाजपाशी जोडणे आवश्यक आहे. ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून या प्रत्येक संघटनेपर्यंत पोहोचायला हवे. स्थानिक नेतृत्वाच्या मदतीने बुथ स्तरापर्यंत ओबीसी मोर्चा आणि त्यातून जोडल्या जाणाºया कार्यकर्त्यांचे संघटन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत ओबीसी मोर्चाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात संवाद से संपर्क अभियानाची सुरुवात केली आहे. आता मुंबई आणि ठाणे येथील कार्यक्रमांनंतर कोकणात अभियान सुरू करण्यात येईल.भायखळा येथील सावित्रीबाई फुले शाळेच्या सभागृहात आयोजित या मेळाव्यास मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यासह ओबीसी मोर्चाचे मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.कोकणातही अभियानमुंबई आणि ठाणे येथील कार्यक्रमांनंतर कोकणात संवाद से संपर्क अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे विजय चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र