शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जरांगेंच्या आव्हानावर भुजबळांनी खेळली पुढची चाल; "आता तर आम्हाला विधानसभा, लोकसभेतही आरक्षण हवे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 17:26 IST

OBC - Maratha Reservation issue: एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. गरीब तर सर्वच आहेत. आमचीही लेकरे काय गाड्या घोड्यात फिरत नाहीत, भुजबळांची जरांगेवर टीका.

ओबीसी नेते कसे निवडून येतात तेच पाहतो, असे जरांगे पाटलांनी उघडपणे आव्हान दिल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींना निवडून येण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेतही आरक्षण हवे अशी मागणी केली आहे. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण स्थगित केले. यानंतर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

जरांगे पाटील ओबीसी नेते कसे निवडून येतात ते पाहतो. त्यांना पाडण्याची भाषा करत आहेत. अशातच भुजबळांनी पुढची चाल खेळली आहे. आम्ही लोकसभेत जायचे नाही, विधानसभेत जायचे नाही. गरीब तर सर्वच आहेत. आमचीही लेकरे काय गाड्या घोड्यात फिरत नाहीत. आता लोकसभा आणि विधानसभेतही आम्हाला आरक्षण पाहिजे. जात गणना झालीच पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. 

आंदोलनाला बसलेले भटक्या विमुक्त आणि ओबीसींचे वाघ आहेत. दोन तीन वेळेला आमचे सहकारी इथे येवून गेले. कालच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली त्यानुसार आम्ही भेटायला आलो. गेले दहा दिवस अनेक ठिकाणी उपोषणे सुरु आहेत. शेवटी आपल्याला लढायचे आहे. त्यामुळे आमचे वाघ आम्हाला रस्त्यावर पाहिजेत. धमक्या बिमक्या खुप येतात पण जाऊद्या. शरीफ है हम, किसीसी लढते नही है हम, जमाना जानता है हम किसीके बापसे डरते नही, अशा शब्दांत शेर सुनावत भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढविला. 

नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि 17 तारखेला इथे आलेलो. स्थानिक नेत्यांनी चांगले सहकार्य केल्याबदल आभारी आहे. अंतरवाली सराटीतून जे येऊन गेले त्यांचेही आभार मानतो. लढाई संपलेली नाही अजून आपल्याला खुप लढावे लागणार आहे. मला कल्पना आहे निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणकीनंतर घरांवर हल्ला करण्यात आला. मारपीट झाली हे सगळे पाहून जीव जळत होता. कितीही मोठी शक्ती असली तरी लोकशाहीत त्या शक्तीचा पराभव होतो. धनशक्ती नाही तर ही लोकशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, असे भुजबळ म्हणाले. 

तसेच आमच्या ताटातले असेच राहु द्या, त्यांना दुसऱ्या ताटातले द्या म्हणत आम्ही त्याला पाठिंबा दिला. एक लक्षात ठेवा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी 300 वर्षांपूर्वी सांगितलं जे गरीब आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. शाहू महाराजांनीही हेच सांगितलेले, असेही भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण