शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

पायाभूत सुविधा क्षेत्र वाढल्यास ‘एनपीए’ घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 3:52 AM

सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायला सुरुवात झाल्यास राष्ट्रीयीकृत बँकांचा वेगाने वाढत असलेला ‘एनपीए’ (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) कमी होईल

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायला सुरुवात झाल्यास राष्ट्रीयीकृत बँकांचा वेगाने वाढत असलेला ‘एनपीए’ (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) कमी होईल, असे मत युनियन बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण तिवारी यांनी व्यक्त केले.अरुण तिवारी आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी रविवारी बँक क्षेत्राशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली. विजय दर्डा यांचे निवासस्थान यवतमाळ हाऊस येथे ही चर्चा झाली. याप्रसंगी वरिष्ठ संपादकीय कर्मचारी उपस्थित होते. तिवारी यांनी ‘एनपीए’संदर्भात वरीलप्रमाणे भूमिका मांडली. देशातील सर्व २६ राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘एनपीए’ सहा लाख कोटी रुपयांवर गेला आहे. युनियन बँकेचादेखील ‘एनपीए’ ७ टक्के असून, ही रक्कम सुमारे २१ हजार कोटी रुपये होते. राष्ट्रीयीकृत बँकांचा ७० टक्के ‘एनपीए’ सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांमुळे आहे. विद्यमान शासनाकडे राजकीय इच्छाशक्ती असून, या शासनाने सदर क्षेत्राला वर आणण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. सिमेंट उद्योगाने कात टाकायला सुरुवात केली असून, अन्य उद्योगही मंदीतून लवकरच बाहेर येतील. त्यामुळे ‘एनपीए’ घटायला लागेल, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.‘एनपीए’ वाढत असल्यामुळे युनियन बँक आॅफ इंडियाने गेल्या दोन वर्षांपासून कॉर्पोरेट कर्ज वितरण बंद केले आहे. त्याऐवजी किरकोळ व्यापार, कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही योजना यशस्वी ठरली असून गेल्या दोन वर्षांमध्ये या क्षेत्रातील ‘लोन पोर्टफोलिओ’मध्ये २२ ते २६ टक्के वृद्धी झाली आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली. युनियन बँकेकडे सध्या ३ लाख ७८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यात सुमारे ३५ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार कोटी रुपयांच्या ठेवी चालू व बचत खात्यांतील आहेत. त्यामुळे बँकेचा कर्जावरील खर्च कमी करण्यास व कर्ज वितरणाचे नवीन धोरण पुढे लागू ठेवण्यास मदत होत आहे, असे तिवारी यांनी सांगितले.विदेशी गंगाजळीबाबत तिवारी यांनी म्हणाले, भारताकडे सध्या ३ कोटी ७५ हजार यूएस डॉलर्स विदेशी चलन असून, परिस्थिती समाधानकारक आहे. शेतकऱ्यांकडे मौल्यवान जमीन असूनही त्यांना कर्ज का मिळत नाही, याचे स्पष्टीकरण देताना तिवारी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. याप्रसंगी युनियन बँकेचे महाव्यवस्थापक एम. व्यंकटेश, नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक दास व लोकमत वृत्तपत्र समूहाचे वित्त नियंत्रक सीए मोहन जोशी उपस्थित होते.विजय दर्डा यांनी बँक-ग्राहक नात्याविषयी प्रश्न विचारला असता तिवारी यांनी गमतीदार उत्तर दिले. भारतामध्ये बँक-ग्राहक नाते हिंदू पती-पत्नीसारखे आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम असते व त्यांची भांडणेही होतात. असेच बँक व ग्राहकांचे आहे. त्यांचे नाते काळानुसार अधिक घट्ट होत जाते, असे तिवारी यांनी सांगितले.अरुण तिवारी यांनी यवतमाळ हाऊस येथे प्रवेश केला असता त्यांचे कपाळाला कुंकुवाचा टिळा लावून स्वागत करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना विजय दर्डा यांनी ही परंपरा त्यांच्या दिवंगत मातोश्री वीणादेवी दर्डा यांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुरू केली होती, असे सांगितले. मातोश्री वीणादेवी दर्डा यांचा २०१२ मध्ये स्वर्गवास झाला आहे. ही परंपरा आजही पाळली जात आहे, असे सांगताना विजय दर्डा भावूक झाले होते.