शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

आता नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी

By admin | Updated: April 28, 2017 01:24 IST

शालेय शिक्षणाचा निर्णय: जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार परीक्षा

नीलिमा शिंगणे - जगड - अकोलाइयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला ज्याप्रमाणे पुनर्परीक्षेची संधी दिली जाते, त्याचप्रमाणे इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यालादेखील पुनर्परीक्षेची संधी दिली जाईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही पुनर्परीक्षा शाळा स्तरावर होईल. इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा कधी घेण्यात यावी, यासंदर्भातील प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता; मात्र गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय घेऊन नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या शैक्षणिक नुकसानापासून वाचविले आहे.माध्यमिक स्तरावर शासन निर्णयानुसार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर व जलद गतीने शिक्षणाद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर याबाबतचा शासन निर्णय शैक्षणिक वर्षामध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये निर्गमित झाल्याने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये नैदानिक चाचण्यांचे आयोजन करता येणे शक्य झाले नाही. म्हणूनच शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ पासून इयत्ता नववी व इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील, तसेच नैदानिक चाचण्यांच्या निकालावरू न ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता अडचणी येऊ शकतात, अशा विद्यार्थ्यांसाठी जलद गतीने शिक्षण पद्धतीचा अवलंब करू न या सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक ते सर्व साहाय्य पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांकडून करण्यात येईल. याकरिता आवश्यक प्रशिक्षणाचे आयोजन राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ व विद्या प्राधिकरणामार्फत करण्यात येईल. नैदानिक चाचण्या विद्या प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येतील व या चाचण्या शाळांमधून घेण्याची जबाबदारी राज्य मंडळाची राहील. शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ मध्ये सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववीमधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षणाच्या पद्धती अमलात आणल्यावरदेखील जर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करू न दिली जाईल. सन २०१७-१८ या वर्षाकरिता पुनर्परीक्षा जून २०१८ मध्ये होईल. पुनर्परीक्षेकरिता मूल्यमापन पद्धती इयत्ता नववीकरिता असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणेच राहील.नापास झाल्यामुळे एक वर्ष वाया जाऊन मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तसे होऊ नये म्हणून दहावीप्रमाणेच नववीची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. - विनोद तावडे, शिक्षण मंत्री, महाराष्ट्रआर्थिक परिस्थिती, आजारामुळे काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षेची संधी आवश्यकच होती. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.- प्रभाकर रूमाले, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक.