रिकार्पेटिंगचे काम पूर्ण : विमानसेवाही झाली सुरळीत नागपूर : आठ वर्षांंंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाले आहे. अनेक दिवसांपासून धावपट्टीवर खाचखळगे पडल्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांना विमान लँडिंग आणि टेकऑफ होताना झटके बसत होते. परंतू आता रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे ही समस्या दूर झाली आहे. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ३ हजार २00 मीटर लांबीच्या धावपट्टीची रिकार्पेटिंग २00३-0४ मध्ये करण्यात आली होती. नियमानुसार ५ वर्षानंतर धावपट्टीवर नवे आवरण चढविणे गरजेचे आहे. परंतू दुप्पट कालावधी उलटल्यानंतरही रिकार्पेटिंग झाले नव्हते. धावपट्टीची डागडुजी करून तात्पुरते काम भागविण्यात येत होते. यामुळे वैमानिकाला आणि प्रवाशांना मोठा त्रास होत होता. मागील वर्षी भारतीय विमान प्राधिकरणाकडे हे काम सोपविण्यात आले होते. भारतीय विमान प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (सीएनएस) शफीक शाह यांनी सांगितले की, धावपट्टीवर ४ इंच मोठे आवरण चढविण्यात आले आहे. सध्या धावपट्टीच्या किनार्यावर ग्रेडिंग आणि साईड लेव्हलींगचे काम सुरू आहे. यामुळे धावपट्टीवर पावसाळ्यात पाणी साचून राहणार नाही. धावपट्टीवर प्रत्येक ठिकाणी लेव्हलची तपासणी करून मजबूत आवरण चढविण्यात आले आहे. धावपट्टी बंद ठेवण्याची वेळ संपली वरिष्ठ विमानतळ संचालक अनिल कुमार म्हणाले, रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे विमानांचे संचालन सुरळीत झाले आहे. हे काम होण्यापूर्वी सकाळी ९.३0 ते दुपारी ४.३0 दरम्यान धावपट्टी बंद ठेवण्यात येत होती. सध्या धावपट्टीवर काही काम शिल्लक असल्यामुळे दुपारी १ ते दुपारी ४.३0 पर्यंंंत धावपट्टी बंद ठेवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
आता विमान प्रवाशांना लागणार नाहीत झटके
By admin | Updated: May 25, 2014 00:55 IST