शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

आता विमान प्रवाशांना लागणार नाहीत झटके

By admin | Updated: May 25, 2014 00:55 IST

आठ वर्षांंंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाले आहे. अनेक दिवसांपासून धावपट्टीवर खाचखळगे

रिकार्पेटिंगचे काम पूर्ण : विमानसेवाही झाली सुरळीत

नागपूर : आठ वर्षांंंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाले आहे. अनेक दिवसांपासून धावपट्टीवर खाचखळगे पडल्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांना विमान लँडिंग आणि टेकऑफ होताना झटके बसत होते. परंतू आता रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे ही समस्या दूर झाली आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ३ हजार २00 मीटर लांबीच्या धावपट्टीची रिकार्पेटिंग २00३-0४ मध्ये करण्यात आली होती. नियमानुसार ५ वर्षानंतर धावपट्टीवर नवे आवरण चढविणे गरजेचे आहे. परंतू दुप्पट कालावधी उलटल्यानंतरही रिकार्पेटिंग झाले नव्हते. धावपट्टीची डागडुजी करून तात्पुरते काम भागविण्यात येत होते. यामुळे वैमानिकाला आणि प्रवाशांना मोठा त्रास होत होता. मागील वर्षी भारतीय विमान प्राधिकरणाकडे हे काम सोपविण्यात आले होते.

भारतीय विमान प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (सीएनएस) शफीक शाह यांनी सांगितले की, धावपट्टीवर ४ इंच मोठे आवरण चढविण्यात आले आहे. सध्या धावपट्टीच्या किनार्‍यावर ग्रेडिंग आणि साईड लेव्हलींगचे काम सुरू आहे.

यामुळे धावपट्टीवर पावसाळ्यात पाणी साचून राहणार नाही. धावपट्टीवर प्रत्येक ठिकाणी लेव्हलची तपासणी करून मजबूत आवरण चढविण्यात आले आहे.

धावपट्टी बंद ठेवण्याची वेळ संपली

वरिष्ठ विमानतळ संचालक अनिल कुमार म्हणाले, रिकार्पेटिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे विमानांचे संचालन सुरळीत झाले आहे. हे काम होण्यापूर्वी सकाळी ९.३0 ते दुपारी ४.३0 दरम्यान धावपट्टी बंद ठेवण्यात येत होती.

सध्या धावपट्टीवर काही काम शिल्लक असल्यामुळे दुपारी १ ते दुपारी ४.३0 पर्यंंंत धावपट्टी बंद ठेवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)