शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

आता आॅनलाइन पेपर तपासणी

By admin | Updated: January 25, 2017 05:16 IST

मुंबई विद्यापीठात परीक्षेनंतर पेपर तपासणीला वेळ लागला, गुण कमी दिले असे अनेक प्रकार घडत असतात. पेपर तपासनीसांच्या अनेक तक्रारी असतात.

मुंबई : मुंबई विद्यापीठात परीक्षेनंतर पेपर तपासणीला वेळ लागला, गुण कमी दिले असे अनेक प्रकार घडत असतात. पेपर तपासनीसांच्या अनेक तक्रारी असतात. पण मार्च - एप्रिलमध्ये मुंबई विद्यापीठांतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या निकालामध्ये असे कोणतेही प्रकार होणार नाहीत. कारण, आता पेपर तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देखमुख यांनी जाहीर केले. याआधी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासले जात होते. आता ही प्रणाली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी आणि तंत्रज्ञान शाखेतील सर्व पेपर तपासणीला लागू होणार आहे. या बदलामुळे यापुढे पेपर तपासनीसांना हातात पेन घेऊन पान उलटत बसावे लागणार नाही. पेपर तपासणीमध्ये पारदर्शकता यावी, तपासनीसांचा वेळ वाचावा यासाठी आॅनलाइन तपासणीची सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी विविध शाखांतील ४०२ परीक्षांचे आयोजन करण्यात येत असून, १९ लाख ५० हजार उत्तरपत्रिका (३२ पानी एक ) छापण्यात येतात. आॅनलाइन तपासणीमुळे तपासनीसांचा त्रास कमी होईल. आणि पेपर तपासणीला कमी वेळ लागणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. परीक्षा झाल्यावर सर्व उत्तरपत्रिका या स्कॅन केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तपासनीसाला एक आयडी तयार करून देण्यात येईल. या आयडीवर लॉग इन करून तपासनीसाला पेपर तपासता येणार आहे. पेपर तपासून झाल्यावर कोणत्याही प्रकारे गुणांमध्ये बदल करता येणार नसल्यामुळे गुण कमी-जास्त झाले, मोजायचे राहून गेले या घटनांना आळा बसणार आहे. आॅनलाइन पेपर तपासणी करणे तपासनीसांना सोपे जाणार आहे. सध्या सर्व प्राध्यापक, शिक्षक संगणक वापरतात. त्यामुळे त्यांना हे कठीण जाणार नाही. यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. पण, तशी गरज पडणार नाही. त्यांना प्रणाली समजावून सांगण्यात येईल. तपासनीसांची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे मत डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. एप्रिलमध्ये नवे परीक्षा भवनमुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ कालिना कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेले ६ मजली नवे परीक्षा भवन एप्रिल महिन्यात कार्यान्वित होणार आहे. हे भवन अद्ययावत असून, संगणकांची सोय करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये फक्त परीक्षेचे कामकाज चालणार आहे. या इमारतीमध्ये एसी आहे. उत्तरपत्रिकासाठी असणारे रॅक येथे कमी दिसतील. (प्रतिनिधी)आठ दिवसांत लागणार टीवायबीकॉमचा निकाल१ टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा संपून तीन महिने उलटल्यावरही निकाल जाहीर झाला नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत. सहाव्या सत्राची परीक्षेची तारीख जवळ येत असूनही आधीच्या सत्राचा निकाल लागला नसल्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठावर टीका होत आहे. पण, पुढच्या आठ दिवसांत टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. २ तीन वर्षांपूर्वीपर्यंत टीवाय सर्वच पदवी परीक्षा या एकदाच विद्यापीठामार्फत व्हायच्या. पण, गेल्या तीन वर्षांपासून या परीक्षा प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानुसार, आता पदवी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतल्या जातात. टीवायबीकॉमसाठी सुमारे ६८ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पाचव्या सत्राच्या परीक्षा पार पडल्यावर विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ३पेपर तपासणी एकाच ठिकाणी करण्यात येत होती. या परीक्षेच्या पेपर तपासणीसाठी वेगळी पद्धत अवलंबण्यात आली होती. महाविद्यालयांत पेपर तपासणी केंद्र सुरू करण्यात आली होती. तिथे पेपर तपासणीला पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा पेपर एकत्र करण्यात आले. यामुळे पेपर तपासणीला वेळ लागला. पण, पेपर तपासणी पूर्ण झाली असून, पुढच्या आठ दिवसांत निकाल जाहीर होईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.