शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

आता आॅनलाइन पेपर तपासणी

By admin | Updated: January 25, 2017 05:16 IST

मुंबई विद्यापीठात परीक्षेनंतर पेपर तपासणीला वेळ लागला, गुण कमी दिले असे अनेक प्रकार घडत असतात. पेपर तपासनीसांच्या अनेक तक्रारी असतात.

मुंबई : मुंबई विद्यापीठात परीक्षेनंतर पेपर तपासणीला वेळ लागला, गुण कमी दिले असे अनेक प्रकार घडत असतात. पेपर तपासनीसांच्या अनेक तक्रारी असतात. पण मार्च - एप्रिलमध्ये मुंबई विद्यापीठांतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या निकालामध्ये असे कोणतेही प्रकार होणार नाहीत. कारण, आता पेपर तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देखमुख यांनी जाहीर केले. याआधी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासले जात होते. आता ही प्रणाली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी आणि तंत्रज्ञान शाखेतील सर्व पेपर तपासणीला लागू होणार आहे. या बदलामुळे यापुढे पेपर तपासनीसांना हातात पेन घेऊन पान उलटत बसावे लागणार नाही. पेपर तपासणीमध्ये पारदर्शकता यावी, तपासनीसांचा वेळ वाचावा यासाठी आॅनलाइन तपासणीची सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी विविध शाखांतील ४०२ परीक्षांचे आयोजन करण्यात येत असून, १९ लाख ५० हजार उत्तरपत्रिका (३२ पानी एक ) छापण्यात येतात. आॅनलाइन तपासणीमुळे तपासनीसांचा त्रास कमी होईल. आणि पेपर तपासणीला कमी वेळ लागणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. परीक्षा झाल्यावर सर्व उत्तरपत्रिका या स्कॅन केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तपासनीसाला एक आयडी तयार करून देण्यात येईल. या आयडीवर लॉग इन करून तपासनीसाला पेपर तपासता येणार आहे. पेपर तपासून झाल्यावर कोणत्याही प्रकारे गुणांमध्ये बदल करता येणार नसल्यामुळे गुण कमी-जास्त झाले, मोजायचे राहून गेले या घटनांना आळा बसणार आहे. आॅनलाइन पेपर तपासणी करणे तपासनीसांना सोपे जाणार आहे. सध्या सर्व प्राध्यापक, शिक्षक संगणक वापरतात. त्यामुळे त्यांना हे कठीण जाणार नाही. यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. पण, तशी गरज पडणार नाही. त्यांना प्रणाली समजावून सांगण्यात येईल. तपासनीसांची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे मत डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. एप्रिलमध्ये नवे परीक्षा भवनमुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ कालिना कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेले ६ मजली नवे परीक्षा भवन एप्रिल महिन्यात कार्यान्वित होणार आहे. हे भवन अद्ययावत असून, संगणकांची सोय करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये फक्त परीक्षेचे कामकाज चालणार आहे. या इमारतीमध्ये एसी आहे. उत्तरपत्रिकासाठी असणारे रॅक येथे कमी दिसतील. (प्रतिनिधी)आठ दिवसांत लागणार टीवायबीकॉमचा निकाल१ टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा संपून तीन महिने उलटल्यावरही निकाल जाहीर झाला नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत. सहाव्या सत्राची परीक्षेची तारीख जवळ येत असूनही आधीच्या सत्राचा निकाल लागला नसल्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठावर टीका होत आहे. पण, पुढच्या आठ दिवसांत टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. २ तीन वर्षांपूर्वीपर्यंत टीवाय सर्वच पदवी परीक्षा या एकदाच विद्यापीठामार्फत व्हायच्या. पण, गेल्या तीन वर्षांपासून या परीक्षा प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानुसार, आता पदवी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतल्या जातात. टीवायबीकॉमसाठी सुमारे ६८ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पाचव्या सत्राच्या परीक्षा पार पडल्यावर विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ३पेपर तपासणी एकाच ठिकाणी करण्यात येत होती. या परीक्षेच्या पेपर तपासणीसाठी वेगळी पद्धत अवलंबण्यात आली होती. महाविद्यालयांत पेपर तपासणी केंद्र सुरू करण्यात आली होती. तिथे पेपर तपासणीला पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा पेपर एकत्र करण्यात आले. यामुळे पेपर तपासणीला वेळ लागला. पण, पेपर तपासणी पूर्ण झाली असून, पुढच्या आठ दिवसांत निकाल जाहीर होईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.