शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आता आॅनलाइन पेपर तपासणी

By admin | Updated: January 25, 2017 05:16 IST

मुंबई विद्यापीठात परीक्षेनंतर पेपर तपासणीला वेळ लागला, गुण कमी दिले असे अनेक प्रकार घडत असतात. पेपर तपासनीसांच्या अनेक तक्रारी असतात.

मुंबई : मुंबई विद्यापीठात परीक्षेनंतर पेपर तपासणीला वेळ लागला, गुण कमी दिले असे अनेक प्रकार घडत असतात. पेपर तपासनीसांच्या अनेक तक्रारी असतात. पण मार्च - एप्रिलमध्ये मुंबई विद्यापीठांतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या निकालामध्ये असे कोणतेही प्रकार होणार नाहीत. कारण, आता पेपर तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देखमुख यांनी जाहीर केले. याआधी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेपर आॅनलाइन पद्धतीने तपासले जात होते. आता ही प्रणाली विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी आणि तंत्रज्ञान शाखेतील सर्व पेपर तपासणीला लागू होणार आहे. या बदलामुळे यापुढे पेपर तपासनीसांना हातात पेन घेऊन पान उलटत बसावे लागणार नाही. पेपर तपासणीमध्ये पारदर्शकता यावी, तपासनीसांचा वेळ वाचावा यासाठी आॅनलाइन तपासणीची सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षी विविध शाखांतील ४०२ परीक्षांचे आयोजन करण्यात येत असून, १९ लाख ५० हजार उत्तरपत्रिका (३२ पानी एक ) छापण्यात येतात. आॅनलाइन तपासणीमुळे तपासनीसांचा त्रास कमी होईल. आणि पेपर तपासणीला कमी वेळ लागणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. परीक्षा झाल्यावर सर्व उत्तरपत्रिका या स्कॅन केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तपासनीसाला एक आयडी तयार करून देण्यात येईल. या आयडीवर लॉग इन करून तपासनीसाला पेपर तपासता येणार आहे. पेपर तपासून झाल्यावर कोणत्याही प्रकारे गुणांमध्ये बदल करता येणार नसल्यामुळे गुण कमी-जास्त झाले, मोजायचे राहून गेले या घटनांना आळा बसणार आहे. आॅनलाइन पेपर तपासणी करणे तपासनीसांना सोपे जाणार आहे. सध्या सर्व प्राध्यापक, शिक्षक संगणक वापरतात. त्यामुळे त्यांना हे कठीण जाणार नाही. यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. पण, तशी गरज पडणार नाही. त्यांना प्रणाली समजावून सांगण्यात येईल. तपासनीसांची मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे मत डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. एप्रिलमध्ये नवे परीक्षा भवनमुंबई विद्यापीठाच्या सांताक्रुझ कालिना कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेले ६ मजली नवे परीक्षा भवन एप्रिल महिन्यात कार्यान्वित होणार आहे. हे भवन अद्ययावत असून, संगणकांची सोय करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये फक्त परीक्षेचे कामकाज चालणार आहे. या इमारतीमध्ये एसी आहे. उत्तरपत्रिकासाठी असणारे रॅक येथे कमी दिसतील. (प्रतिनिधी)आठ दिवसांत लागणार टीवायबीकॉमचा निकाल१ टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा संपून तीन महिने उलटल्यावरही निकाल जाहीर झाला नसल्यामुळे विद्यार्थी चिंतित आहेत. सहाव्या सत्राची परीक्षेची तारीख जवळ येत असूनही आधीच्या सत्राचा निकाल लागला नसल्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठावर टीका होत आहे. पण, पुढच्या आठ दिवसांत टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. २ तीन वर्षांपूर्वीपर्यंत टीवाय सर्वच पदवी परीक्षा या एकदाच विद्यापीठामार्फत व्हायच्या. पण, गेल्या तीन वर्षांपासून या परीक्षा प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानुसार, आता पदवी परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतल्या जातात. टीवायबीकॉमसाठी सुमारे ६८ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पाचव्या सत्राच्या परीक्षा पार पडल्यावर विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ३पेपर तपासणी एकाच ठिकाणी करण्यात येत होती. या परीक्षेच्या पेपर तपासणीसाठी वेगळी पद्धत अवलंबण्यात आली होती. महाविद्यालयांत पेपर तपासणी केंद्र सुरू करण्यात आली होती. तिथे पेपर तपासणीला पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा पेपर एकत्र करण्यात आले. यामुळे पेपर तपासणीला वेळ लागला. पण, पेपर तपासणी पूर्ण झाली असून, पुढच्या आठ दिवसांत निकाल जाहीर होईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.