शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आता आमदारांना द्यावे लागणार 'रिपोर्ट कार्ड', पंतप्रधान मोदींना राज्यासाठीचे व्हिजनही द्यावे लागणार!

By यदू जोशी | Updated: January 14, 2025 07:44 IST

महायुतीच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या आमदारांचा पहिल्यांदाच अडीच तासांचा क्लास घेणार आहेत. 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यात संवाद साधणार असून त्यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आला आहे. महायुतीच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या आमदारांचा पहिल्यांदाच अडीच तासांचा क्लास घेणार आहेत. 

आमदारांना या संवादाची उत्सुकता आहेच, पण आता त्यांना मोदींच्या क्लाससाठी काय तयारी करून ठेवायची आहे, या संबंधीचे एक पत्र देण्यात आले आहे. हे पत्र बघितल्यानंतर आमदार जरा धास्तावलेदेखील आहेत. विशेषतः कुठली तयारी करून यायचे आहे यासंबंधी पत्रात सूचना करण्यात आल्या असून आता सगळे आमदार त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना या सूचना केल्या आहेत.

इतके बहुमत कसे मिळाले? महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाले. आपल्या मते या यशाची कारणे कोणती? हे पंतप्रधान मोदी आमदारांकडून जाणून घेण्याची शक्यता आहे. अडीच वर्षातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने काय काय केले, त्याचा राज्याला किती फायदा झाला?

केंद्र आणि राज्याच्या योजनांची अंमलबजावणी कशी करता? -  आपण आमदार म्हणून मतदारसंघात काय करत आहात, आता काय करणार आहात याची संक्षिप्त टिपणी तयार करून ठेवायला आमदारांना सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनी काही अचानक विचारले तर तुमची तयारी असली पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची २ अंमलबजावणी तुमच्या मतदारसंघामध्ये किती प्रभावीपणे होत आहे याचा अहवालही तयार ठेवायला सांगितले आहे.

- राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनाचा २ अंमलबजावणी तुमच्या मतदारसंघामध्ये किती प्रभावीपणे होत आहे याचा अहवालही तयार ठेवायला सांगितले आहे.

- तसेच, मतदारसंघातील केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थीची सध्याची सामाजिक, आर्थिक स्थिती काय आहे, या योजनांमुळे त्यांच्या जीवनात काय परिवर्तन आले याची माहितीही द्यायला सांगण्यात आले आहे, अशी माहिती महायुतीच्या एका आमदाराने 'लोकमत'ला दिली. 

मतदारांशी संपर्क करता काय? मतदारसंघात मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी कुठले उपक्रम राबवता, जनसंपर्काची पद्धत काय आहे? आपला मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचे पुढील पाच वर्षांसाठीचे आपले व्हिजन काय आहे याची माहितीदेखील आमदारांना तयार ठेवायला सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र