आता ‘मिशन जेईई-अ‍ॅडव्हान्स’

By Admin | Updated: May 24, 2014 01:03 IST2014-05-24T01:03:21+5:302014-05-24T01:03:21+5:30

देशातील अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘जेईई-मेन्स’ नंतर विद्यार्थ्यांसमोर आव्हान आहे ते ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चे. येत्या २५ तारखेला ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’

Now 'Mission JEE-Advance' | आता ‘मिशन जेईई-अ‍ॅडव्हान्स’

आता ‘मिशन जेईई-अ‍ॅडव्हान्स’

२५ मे रोजी परीक्षा : उपराजधानीतून ४०० हून अधिक विद्यार्थी तयारीत

नागपूर : देशातील अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘जेईई-मेन्स’ नंतर विद्यार्थ्यांसमोर आव्हान आहे ते ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चे. येत्या २५ तारखेला ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा होणार असून यातील गुणांच्या आधारे ‘आयआयटी’ व ‘आयएसएम-धनबाद’ सारख्या संस्थेचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहेत. या महत्त्वाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी कसून तयारीला लागले आहेत. देशस्तरावर ‘जेईई-मेन्स’मधून पहिल्या दीड लाख विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. नागपुरातील महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी ‘जेईई’साठी अर्ज केला होता. त्यातील ४०० हून अधिक विद्यार्थी ‘आयआयटी-अ‍ॅडव्हान्स’या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा २५ मे रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात यासाठी केवळ चारच शहरात केंद्र देण्यात आली आहेत. यात नागपूरचादेखील समावेश आहे. ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या परीक्षेत विद्यार्थ्यांना ३ तासांचे २ पेपर द्यावे लागणार आहेत. पहिला पेपर सकाळी ९ ते १२ या वेळेत असून दुसरा पेपर दुपारी २ ते ५ या वेळेत आहे. दोन्ही पेपरमध्ये गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे प्रश्न राहतील. इंग्रजी व हिंदी या दोन भाषेत प्रश्न विचारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा सरावावर भर ४दरम्यान, ‘जेईई-मेन्स’च्या निकालानंतर ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची तयारी जोरात सुरू आहे. बहुतांश शिकवणी वर्गात दिवसभरात निरनिराळ्या सत्रांत विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यात येत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी ‘सेल्फ-स्डडी’ तसेच सरावावर भर दिला आहे. या परीक्षेत हुशारीसोबतच ‘टाइम मॅनेजमेन्ट’ व समयसूचकता हेदेखील आवश्यक मुद्दे ठरणार आहेत. मूळ प्रवेशपत्र केंद्रांवरच मिळणार ४‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर इंटरनेटवरुन ‘डाऊनलोड’ केलेले ओळखपत्र न्यायचे आहे. परीक्षा केंद्रांवरच ओळख पटविल्यानंतर विद्यार्थ्यांना मूळ प्रवेशपत्र दिले जाणार आहे. हे मूळ प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी सांभाळून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण प्रवेशादरम्यान हे ओळखपत्र विद्यार्थ्यांना सादर करावे लागणार आहे.

Web Title: Now 'Mission JEE-Advance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.