शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रदेशाध्यक्षांच्या कोल्हापुरात भाजपचा आमदार ना खासदार; आता जिल्हा परिषदही गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 15:48 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक आहे.

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजपची आणखीच पिछेहाट होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आली नाही. आता येथील जिल्हा परिषदही महाराष्ट्रात नुकत्याच उदयास आलेल्या महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतली आहे. 

मागील अडीच वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप सत्तेवर होते. मात्र या सत्तेला आता महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. जिल्हा परिषदेच्या निकालामुळे जिल्ह्यातून भाजप जवळजवळ हद्दपार झाले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघही भाजपकडे नसून शहरातील महानगर पालिका देखील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. या आघाडीने आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही सत्ता काबिज करण्याचे ठरवले असून भाजपला दूर ठेवण्याचा चंगच बांधला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता संपुष्टात आणली आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा पराभव धक्कादायक आहे. पाटील सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांच्याच जिल्ह्यात महाविकास आघाडीने करामत केली आहे.