शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिंचन समृद्धीसाठी राज्यात आता ‘जलनायक’, देशातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 18:55 IST

राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सिंचन समृद्धीसाठी जलनायकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.   

संदीप मानकर

अमरावती :  राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सिंचन समृद्धीसाठी जलनायकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  यशदा (पुणे), वाल्मी (औरंगाबाद), डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय आणि विकास प्रबोधनी (अमरावती) आणि वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनी (चंद्रपूर) यांना विभागीय पातळीवरील जलसाक्षरता केंद्रांच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विविध स्तरांवर प्रशिक्षण देण्याचा व जलक्षेत्रातील कामाचा अनुभव असणा-या प्रशिक्षकांना जलनायक असे संबोधण्यात येते.  त्यांची संख्या  राज्यस्तरावर  ३४ ,  विभागस्तरावर प्रत्येकी ८ असे ४८, जिल्हास्तरावर प्रत्येकी १० असे ३४०, तालुकास्तरावर १२ असे २६८ तालुक्यांत ३२२४  अशी राहणार आहे.

जिल्हा समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जलदूत, जलप्रेमी व जलकर्मी यांचीही निवड करण्यात येईल. संख्येत आवश्यकतेनुसार बदल करणे, विविध स्तरांवरील जलनायकांची कार्यकक्षा निश्चित करणे, त्यांच्या निवडीचे निकष, निवडीची कार्यवाही जलसाक्षरता केंद्रांमार्फत करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय जलसाक्षरता समन्वय समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आहेत. यशदा स्तरावरील जलसाक्षरता समितीचे अध्यक्ष उपमहासंचालक (यशदा), जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर तालुका समितीचे अध्यक्ष तहसीलदार राहणार आहेत. जिल्ह्यात १४० पदांसाठी निवड अमरावती जिल्ह्यात ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग जलनायकांची निवड करणार  आहे. जलसाक्षरता केंद्र यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणेमार्फत जलकर्मी (सेवेतील तांत्रिक अधिकारी),  जिल्हा आणि तालुकास्तरीय जलनायकांची निवड करण्याचे अनुषंगाने जलनायक जलप्रेमी (जिल्हास्तर) एकूण १० पदे व जलनायक जलदूत (तालुकास्तर) प्रत्येकी  १० प्रमाणे या पदांकरिता कुठलेही मानधन न घेता स्वयंस्फूर्तीने  काम करण्यास इच्छुक असणाºया पात्र उमेदवारांकडून  १ ते १५  नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहे.  शासनाचा हा महत्त्वाचा  उपक्रम असून, यामध्ये लोकांना पाण्याची बचत व महत्त्व पटवून देण्यासाठी राज्यभर जलनायकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.  - प्रमोद पोटफोडे,  कार्यकारी अभियंता,ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती. 

 जलनायकांचे कार्य - ग्रामस्तरावरील जलसेवकाला मार्गदर्शन करणे. जलकर्मींना मार्गदर्शन करणे. जलजागृती करणे.

टॅग्स :Waterपाणी