शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कुजबुज: आता ती वेळ आली! बाळासाहेबांचा लाडका नातू तेजस ठाकरे राजकारणात उतरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 06:55 IST

पर्यावरणात रमणारे! त्यांनी युवा सेनेची धुरा खांद्यावर घ्यावी, अशी मागणी आधीपासूनच होत होती. आता ती वेळ आलेली दिसते. 

तेजसही राजकारणात? 

शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांच्या गर्दीला सामोरे गेले. तेथील भाषणानंतर ते आत गेले. तरीही गर्दी तेथेच होती. तेव्हा त्या गर्दीत मिसळले, ते तेजस ठाकरे. आजवर राजकारणापासून अलिप्त असणारे, पर्यावरणात रमणारे! त्यांनी युवा सेनेची धुरा खांद्यावर घ्यावी, अशी मागणी आधीपासूनच होत होती. आता ती वेळ आलेली दिसते. 

आमदारांची रिक्षा सफर

मनसे वर्धापन दिनाच्या अनुषंगाने पुणे येथे आयाेजित रिक्षा साैंदर्य स्पर्धेला आमदार राजू पाटील यांनी उपस्थित राहून रिक्षात बसण्याची मजा लुटली. कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षाचालक म्हटले की, मुजाेर अशी प्रतिमाच डाेळ्यासमाेर उभी राहते. पाटील सांगतात की, अनेक रिक्षाचालक हे आपल्या रिक्षाची पोटच्या मुलाप्रमाणे देखभाल करतात. प्रवाशांचीही काळजी घेतात, असा अनुभवही त्यांनी आवर्जून नमूद केला. चार रिक्षांत बसण्याचा त्यांनी आनंद लुटला. यावेळी त्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींनाही उजाळा दिला. पाटील यांचे रिक्षात बसलेले फाेटाे पाहून कल्याण-डाेंबिवलीतील रिक्षाचालक असे कधी वागणार, असे प्रश्न प्रवाशांना पडल्याशिवाय राहणार नाही. 

पुन्हा वेध मंत्रिपदाचे 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे राज्यात मंत्री होऊ इच्छिणाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. शाह, शिंदे, फडणवीस यांच्या भेटीत मंत्र्यांची नावे निश्चित होतील आणि आपल्याला एकदाची संधी मिळेल म्हणून अनेकांनी पुन्हा एकदा देव पाण्यात घातले, असे म्हणतात. पण अशा भेटीचे संकेत मिळत नसल्याने ती व्हावी, म्हणूनही काहींनी पडद्यामागून सूत्रे हलवण्याचा प्रयत्न केला म्हणे.

काँग्रेसच्या महिला कुठे आहेत?

सध्या ठाण्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. त्यात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. महेश आहेर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी सोमवारी काँग्रेसच्या महिला आघाडीने महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने पाठिंबा दिला. त्यानुसार मुख्यालयासमोर आंदोलन सुरू झाले खरे; मात्र या आंदोलनात काँग्रेसच्या महिलांपेक्षा राष्ट्रवादीच्याच महिला अधिक संख्येने हाेत्या. आंदोलन संपत आले तरी काँग्रेसच्या एक- दोन महिला पदाधिकारी हजर असल्याचे दिसते. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने ‘अरे, आपल्या पक्षाच्या महिला कुठे आहेत?’, असा सवाल पदाधिकाऱ्याला केला. त्यावर ‘त्या येत आहेत,’ असे त्याने सांगितले. त्या येईपर्यंत आंदोलन संपले हाेते. आंदोलन संपत आल्यावर महिलांसाठी मागविलेल्या खुर्च्यांचा टेम्पोही दाखल झाला. मात्र, खुर्च्या काही खाली आल्या नाहीत. त्यामुळे यावरून चांगलीच खमंग चर्चा रंगली होती.

 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना