शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आता राज्यातील सुरक्षारक्षकही विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात, संपाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 05:40 IST

अडचणीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्याची मागणी.

मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता राज्यातील सुरक्षारक्षकही विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.  विलीनीकरणाच्या मागणीसह इतर मागण्या मान्य करा, अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा सुरक्षा रक्षक संघटनेने दिला आहे. 

माय बळीराजा सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष गंगाधर वाघमारे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपासून अनेक संघटना सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी अहोरात्र झटत आहेत. तरी मंडळातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी काही देणे-घेणे नाही, असेच वागत आहेत. अडचणीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे. महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक यंत्रणा एकत्रित कराव्या, जेणेकरून शासनाचा अंकुश सर्व जागी राहील. 

‘प्रतीक्षा यादीतील सुरक्षा रक्षकांना नोकरी द्या’रायगड व पुणे जिल्ह्यात भरती करण्यात आली होती, तसेच इतर सर्व सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना आस्थापणेने बेरोजगार केले आहे. जे आता वेटिंग लिस्टवर आहेत अशा सुरक्षा रक्षकांना मंडळाने इएसआयसी कडील बेरोजगार भत्ता मिळवून द्यावा आणि तत्काळ नोकरी देण्यात यावी, अशी मागणी माय बळीराजा सुरक्षा रक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष  प्रसाद मोरे यांनी  केली.

महाराष्ट्र शासनात मंडळांचे विलीनीकरण होईपर्यंत मंडळाकडून गणवेश आणि इतर असेम्बली साहित्यासाठी निविदा काढण्यात येतात. त्या निविदा घेणाऱ्या कंपन्या सुरक्षा रक्षकांना उच्च दर्जाचे गणवेश, असेम्बली देण्यास असमर्थन दिसत असल्याने निविदा प्रक्रिया रद्द करून त्यावर लेव्हीमधील टक्केवारी प्रमाणे खर्च होणारी रक्कम सुरक्षा रक्षकांच्या बँक खात्यात जमा करावी. जो सुरक्षा रक्षक गणवेश आणि इतर गोष्टी नित्यनेमाने आणि व्यवस्थित परिधान करत नसेल त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून जनमाणसात मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची प्रतिमा चांगली दिसेल आणि मंडळाकडे आस्थापना नोंदी वाढतील. - अभिलाष डावरे, संघटनेचे कार्याध्यक्ष.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र